शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

३० जूनपर्यंत सुरू राहणार खरेदी केंद्र

By admin | Updated: June 12, 2014 00:03 IST

मे महिन्यातच आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रश्नावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास व अन्न नागरी

गडचिरोली : मे महिन्यातच आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रश्नावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री या दोघांकडे खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३० जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी माहिती आ. दीपक आत्राम यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात अनेक शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. विशेषत: सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात घेतला जातो. हा धान शेतकरी विक्रीसाठी आणत असतांनाच शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर दीपक आत्राम यांनी शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. पिचड यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या संदर्भात बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे संचालक असलेले आ. दीपक आत्राम यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला व त्यानंतर अनिल देशमुख यांनी आदिवासी विकास महामंडळाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यानंतर राज्य सरकारने ३० जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी आपला माल महामंडळाच्या केंद्रावर विकावा, असे आवाहन आ. आत्राम यांनी केले आहे.