शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

शिवाजीचा सौरभ तुरे जिल्ह्यात पहिला

By admin | Updated: May 26, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे.

जिल्ह्याचा निकाल ८२.७१ टक्के : शिवकृपा महाविद्यालयाचा प्रतीक भुरसे जिल्ह्यात दुसरागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा सौरभ अविनाश तुरे हा ९२.४६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. गडचिरोलीच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रतीक अनिल भुरसे हा ९१.०७ टक्के गुण घेऊन दुसरा तर गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची अश्विनी ऋषी कुळमेथे ही विद्यार्थिनी ८९ टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. जिल्ह्यात सरासरी निकालात मुलांच्या तुलनेत मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातून १२ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५३ विद्यार्थी प्राविण्यासह तर २ हजार २२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. ७ हजार १८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६४५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झालेत. १० हजार २०६ विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.७२ टक्के, कला शाखेचा निकाल ७६.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८८.३६ टक्के तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचा निकाल ७६.२३ टक्के लागला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाल २९.७२ टक्केगडचिरोली जिल्ह्यातून ६१३ विद्यार्थ्यांनी १२ वीच्या पुनर्परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक विद्यार्थी प्राविण्यासह, सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व १३७ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. ६०९ पैकी केवळ १८१ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी २९.७२ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थींच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल ५२.४८, कला शाखेचा निकाल २५.२२, वाणिज्य शाखेचा निकाल ३५.२९ व किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचा निकाल १८.५२ टक्के लागला आहे.जिल्ह्यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.१५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८४.३६ टक्के आहे.