शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शहिदाचे कुटुंबीय सानुग्रह अनुदानापासून वंचित

By admin | Updated: December 30, 2016 01:56 IST

भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे

पत्रकार परिषद : प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा शहीद जवानाच्या पित्याचा आरोप गडचिरोली : भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप शहीद जवानाचे पिता दादाजी चहांदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र शहीद भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबीयाला अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नाही. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्र व्यवहार व निवेदने सादर करण्यात आली. मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते यांनाही मागील वर्षी निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. क्रिष्णा गजबे, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करून चहांद कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मात्र दिलेल्या निवेदनांना शासनदरबारी केराची टोपली दाखविण्यात आली काय, असा सवालही दादाजी चहांदे यांनी केला आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळावे, याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी शासनाकडे पत्र पाठवून २०१४-१५ या वर्षात सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. परंतु शासन अधिकाऱ्यांच्या पत्राचा विचार करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाविषयी शहीद जवानाच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाला वारंवार पाठविलेल्या निवेदनांचे काय झाले? असा सवाल करीत शासनाने शहीद जवानाचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणीही दादाजी चहांदे यांनी केली. (प्रतिनिधी)