शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सातबाराची साईट अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:03 IST

मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.

ठळक मुद्दे १० दिवस होती बंद : सोमवारपासून सातबारा मिळण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.पीक कर्ज घेणे, खत खरेदी तसेच इतर कामांसाठी सातबाराची गरज भासते. खरीपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी वाढली आहे. अशातच मागील १० दिवस आॅनलाईन सातबाराची साईट बंद होती. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उपलब्ध होत नव्हता. सातबारासाठी तलाठ्याकडे आलेल्या शेतकऱ्याला निराश होऊन परत जावे लागत होते. सातबारा न मिळाल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती. मात्र आॅनलाईन सातबाराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी व तलाठी सुध्दा हैराण झाले होते. सोमवारपासून मात्र सातबाराची साईट सुरू झाली आहे. तलाठ्याचे लॉगीन आयडी टाकल्यानंतर सातबारा उपलब्ध होत आहे. सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सातबारा देण्याबरोबरच फेरफार, नमुना ८ अ देण्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे.आपले सरकार येथून सुध्दा सातबारा उपलब्ध होतो. मात्र सदर साईट अजुनही बंद असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा महाआॅनलाईनच्या सेतू केंद्रातून सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडेच जावे लागत आहे. तलाठ्यांकडून सातबारा उपलब्ध होण्यास सुरूवात झाल्याने शेतकºयांची गैरसोय थांबली आहे. खरीप हंगामापूर्वी विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सातबाराची मागणी होते. साईटमध्ये काही बदल करायचा असल्यास तो खरीपाच्या हंगामानंतर करावा. यानंतर खरीप हंंगाम संपेपर्यंत साईट बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सेतू केंद्रातील समस्या कायमभूअभिलेख, आपले सरकार या पोर्टलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र, महाआॅनलाईनच्या सेवा केंद्रावरूनही सातबारा काढता येतो. मात्र सदर पोर्टल अजुनही सुरू झाले नाही. त्यामुळे या पोर्टलवरून सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. शेतकरी जवळपासच्या केंद्रात जाऊन सातबारा विषयी विचारणा करीत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत पीक कर्ज देण्याची मुदत असल्याने शेतकरी वर्ग सातबारासाठी गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.