शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातबाराची साईट अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:03 IST

मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.

ठळक मुद्दे १० दिवस होती बंद : सोमवारपासून सातबारा मिळण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.पीक कर्ज घेणे, खत खरेदी तसेच इतर कामांसाठी सातबाराची गरज भासते. खरीपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी वाढली आहे. अशातच मागील १० दिवस आॅनलाईन सातबाराची साईट बंद होती. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उपलब्ध होत नव्हता. सातबारासाठी तलाठ्याकडे आलेल्या शेतकऱ्याला निराश होऊन परत जावे लागत होते. सातबारा न मिळाल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती. मात्र आॅनलाईन सातबाराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी व तलाठी सुध्दा हैराण झाले होते. सोमवारपासून मात्र सातबाराची साईट सुरू झाली आहे. तलाठ्याचे लॉगीन आयडी टाकल्यानंतर सातबारा उपलब्ध होत आहे. सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सातबारा देण्याबरोबरच फेरफार, नमुना ८ अ देण्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे.आपले सरकार येथून सुध्दा सातबारा उपलब्ध होतो. मात्र सदर साईट अजुनही बंद असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा महाआॅनलाईनच्या सेतू केंद्रातून सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडेच जावे लागत आहे. तलाठ्यांकडून सातबारा उपलब्ध होण्यास सुरूवात झाल्याने शेतकºयांची गैरसोय थांबली आहे. खरीप हंगामापूर्वी विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सातबाराची मागणी होते. साईटमध्ये काही बदल करायचा असल्यास तो खरीपाच्या हंगामानंतर करावा. यानंतर खरीप हंंगाम संपेपर्यंत साईट बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सेतू केंद्रातील समस्या कायमभूअभिलेख, आपले सरकार या पोर्टलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र, महाआॅनलाईनच्या सेवा केंद्रावरूनही सातबारा काढता येतो. मात्र सदर पोर्टल अजुनही सुरू झाले नाही. त्यामुळे या पोर्टलवरून सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. शेतकरी जवळपासच्या केंद्रात जाऊन सातबारा विषयी विचारणा करीत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत पीक कर्ज देण्याची मुदत असल्याने शेतकरी वर्ग सातबारासाठी गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.