शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सातबारा तपासणीचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 17, 2017 00:55 IST

आॅनलाईन झालेल्या सातबारामध्ये काही प्रमाणात त्रुटी राहिल्याने या त्रुटी दूर करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी राज्यभरात हाती घेण्यात आले.

९९.८२ टक्के कामे पूर्ण : चावडी वाचनानंतर सातबारात झाला बदलदिगांबर जवादे । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅनलाईन झालेल्या सातबारामध्ये काही प्रमाणात त्रुटी राहिल्याने या त्रुटी दूर करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी राज्यभरात हाती घेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात सदर काम आता अंतिम टप्प्यात आहे. एकूण सातबारांपैकी सुमारे ९९.८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामात गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने राज्यभरातील सर्वच जमिनीचे सातबारे आॅनलाईन करण्याचे काम हाती घेतले. याही कामात गडचिरोली जिल्ह्याने आघाडी घेतली व आॅनलाईन सातबारे तयार करण्याचे काम एक वर्षापूर्वीच पूर्ण केले. आॅनलाईन सातबारांची संख्या ३ लाख ४५ हजार ३ एवढी आहे. सातबारा हा जमिनीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे या सातबारात काही त्रुट्या असल्यास त्या शेतकऱ्यांच्या मार्फत दुरूस्त व्हाव्या या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी चावडी वाचनाचा कार्यक्रम जिल्हाभरात आयोजित करण्यात आला होता. या चावडी वाचनादरम्यान नागरिकांनी आॅनलाईन सातबारातील काही त्रुटी दर्शविल्या. त्या त्रुटी दुरूस्त करण्यात आल्या. हे काम गडचिरोली जिल्ह्यात ९९.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. या तपासणीनंतर आणखी फेरतपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तलाठी स्वतंत्र साफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. तलाठ्यांना याबाबतचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्या अधिक गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. तालुकास्तरावर ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध असली तरी नेटची स्पीड अतिशय कमी आहे. अशाही परिस्थितीत येथील तलाठ्यांनी नियोजित वेळेत सातबारा आॅनलाईन करण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये तर अजूनपर्यंत सातबाराच आॅनलाईन झाले नाही. गडचिरोली जिल्ह्यात मात्र हे काम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. फेरतपासणीचे उद्दिष्ट दिल्यानंतर सदर उद्दिष्ट सुध्दा नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. ही बाब इतर जिल्ह्यातील तलाठ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आॅनलाईन सातबारातदोन कॉलम कमीहस्तलिखीत सातबारामध्ये खालच्या बाजूस असलेल्या पिकांची नोंदवहीमध्ये एकूण १६ कॉलम होते. मात्र आॅनलाईन सातबारात शेवटचे दोन कॉलम कमी करण्यात आल्या आहेत. १५ व्या कॉलममध्ये जमीन करणाऱ्याचे नाव तर १६ वे कॉलम शेराशी संबंधित आहे. १५ व्या कॉलममध्ये त्यावर्षी प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याचे नाव तर शेरामध्ये शेतातील विहीर, झाड या संदर्भातील नोंदी घेतल्या जात होत्या. मात्र आॅनलाईन सातबारात ही दोन्ही कॉलम कमी झाले आहेत. सद्य:स्थितीत ज्याची जमीन आहे, तोच कसणारा राहत असल्याचे दाखविले जात असल्याने १५ व्या कॉलमची गरज राहिलेली नाही, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.