शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पीएसआयला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना सश्रम कारावास

By admin | Updated: July 2, 2016 01:40 IST

अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ...

चार्मोशी: अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना चामोर्शीच्या न्यायालयाने शुक्रवारी एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये गंडर ऊर्फ हरिमोहन हजारी हलधर (३१), मिरीनल विमल सिकदार (३३), जयदेव ओबिला मंडल (६३), गौतम महानंदा मंडल (४१), पप्पू गुरूपद भक्तो (२३), पंकज अर्जुन सरकार (३६), शंकर हजारी हलधर (४२) सर्व रा. सुभाषग्राम ता. चामोर्शी यांचा समावेश आहे. मारहाण केल्यानंतर कुलूपबंद खोलीत ठेवल्याबाबतची तक्रार घोटचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत बोराडे, हेमराजसिंह राजपूत यांनी केला. आरोपींविरोधात त्यांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी या प्रकरणात एकूण १४ साक्षदारांचे बयान नोंदविले. दोन्ही बाजुकडील वकीलांचा युक्तीवाद ऐकून त्यांनी सातही आरोपींना भादंविचे कलम १४३, १४७, ३३२, ३४२, १८६ व १४९ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले. असा घडला प्रकारघोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे हे दुधकुमार बॅनर्जी यांच्या नावाने निघालेल्या अटक वारंटची तामील करण्यासाठी ४ एप्रिल २०१० रोजी सुभाषग्राम येथे शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसोबत गेले. हरिमोहन हलदर यांच्या घरी गेल्यावर तेथे ग्रा.पं.ची निवडणूक असल्याने आरोपींनी पीएसआय शिंदे व कर्मचारी शेडमाके यांना घेराव करून मारहाण केली. त्यानंतर कुलूप लावून खोलीत बंद केले. तसेच शिंदे यांच्या हातातील बॅनर्जी यांचा अटक वारंट हरिमोहन हलदर याने फाडला.