शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सेतू भारतम् योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.

ठळक मुद्देचार वर्ष उलटले : देसाईगंजात बायपास की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसावंगी : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या नवघोषित राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते परिवहन व राष्ट्रीयमहामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. सेतू भारतम् योजना म्हणून थाटामाटात योजना सुरू करण्यात आली. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरात बायपास मिळणार की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम आहे.साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.भूमिगत रेल्वे पुलाच्या अप्रोच रस्त्यावरून केवळ दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार आदी वाहने आवागमन करू शकतात. रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर असल्याने येथून मोठी उंच वाहने जाऊ शकत नाही. वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज-साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मित भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु येथून मोठी व जड वाहने आवागमन करू शकत नाही. त्यामुळे वडसा-ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्सी कब्रस्तान शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.देसाईगंज येथील वाढती वाहतूक लक्षात घेता शहरात फ्लॉयओव्हर निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता कधी होणार, याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.१० ते १२ वेळा प्रभावित होते वाहतूकदेसाईगंज येथील बायपास की फ्लॉयओव्हर हा मुद्दा सध्यातरी संपुष्ठात आलेला नाही. साकोली-देसाईगंज-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राज्य मार्गाला ३५३ सी राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. देसाईगंज शहर चांदाफोर्ट-गोंदिया-वडसा रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी तर दुसºया भागात मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बाजार परिसरात वारंवार कामानिमित्त जावे लागते. मात्र शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे दिवसातून १० ते १२ वेळा रेल्वे फाटक बंद होते. नागरिकांना ताटकळत राहावे लागते.आत्तापर्यंत केंद्र शासनाने देसाईगंज शहराला बायपास अथवा फ्लॉयओव्हरसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही.- संजीव जगताप, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, भंडारा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा