शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सेतू भारतम् योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.

ठळक मुद्देचार वर्ष उलटले : देसाईगंजात बायपास की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसावंगी : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या नवघोषित राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते परिवहन व राष्ट्रीयमहामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. सेतू भारतम् योजना म्हणून थाटामाटात योजना सुरू करण्यात आली. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरात बायपास मिळणार की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम आहे.साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.भूमिगत रेल्वे पुलाच्या अप्रोच रस्त्यावरून केवळ दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार आदी वाहने आवागमन करू शकतात. रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर असल्याने येथून मोठी उंच वाहने जाऊ शकत नाही. वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज-साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मित भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु येथून मोठी व जड वाहने आवागमन करू शकत नाही. त्यामुळे वडसा-ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्सी कब्रस्तान शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.देसाईगंज येथील वाढती वाहतूक लक्षात घेता शहरात फ्लॉयओव्हर निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता कधी होणार, याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.१० ते १२ वेळा प्रभावित होते वाहतूकदेसाईगंज येथील बायपास की फ्लॉयओव्हर हा मुद्दा सध्यातरी संपुष्ठात आलेला नाही. साकोली-देसाईगंज-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राज्य मार्गाला ३५३ सी राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. देसाईगंज शहर चांदाफोर्ट-गोंदिया-वडसा रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी तर दुसºया भागात मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बाजार परिसरात वारंवार कामानिमित्त जावे लागते. मात्र शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे दिवसातून १० ते १२ वेळा रेल्वे फाटक बंद होते. नागरिकांना ताटकळत राहावे लागते.आत्तापर्यंत केंद्र शासनाने देसाईगंज शहराला बायपास अथवा फ्लॉयओव्हरसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही.- संजीव जगताप, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, भंडारा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा