शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सेतू भारतम् योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.

ठळक मुद्देचार वर्ष उलटले : देसाईगंजात बायपास की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसावंगी : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या नवघोषित राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते परिवहन व राष्ट्रीयमहामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. सेतू भारतम् योजना म्हणून थाटामाटात योजना सुरू करण्यात आली. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरात बायपास मिळणार की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम आहे.साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.भूमिगत रेल्वे पुलाच्या अप्रोच रस्त्यावरून केवळ दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार आदी वाहने आवागमन करू शकतात. रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर असल्याने येथून मोठी उंच वाहने जाऊ शकत नाही. वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज-साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मित भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु येथून मोठी व जड वाहने आवागमन करू शकत नाही. त्यामुळे वडसा-ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्सी कब्रस्तान शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.देसाईगंज येथील वाढती वाहतूक लक्षात घेता शहरात फ्लॉयओव्हर निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता कधी होणार, याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.१० ते १२ वेळा प्रभावित होते वाहतूकदेसाईगंज येथील बायपास की फ्लॉयओव्हर हा मुद्दा सध्यातरी संपुष्ठात आलेला नाही. साकोली-देसाईगंज-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राज्य मार्गाला ३५३ सी राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. देसाईगंज शहर चांदाफोर्ट-गोंदिया-वडसा रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी तर दुसºया भागात मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बाजार परिसरात वारंवार कामानिमित्त जावे लागते. मात्र शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे दिवसातून १० ते १२ वेळा रेल्वे फाटक बंद होते. नागरिकांना ताटकळत राहावे लागते.आत्तापर्यंत केंद्र शासनाने देसाईगंज शहराला बायपास अथवा फ्लॉयओव्हरसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही.- संजीव जगताप, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, भंडारा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा