शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

By admin | Updated: August 3, 2014 00:06 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील २२ लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे व खतांचे

२२ लाभार्थी : भामरागड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फेभामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील २२ लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले.जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात नव्हता. परिणामी कर्ज काढूनच शेती करावी लागत होती. हे सर्व करतांना गरीब शेतकऱ्याची फार मोठी अडचण होत होती. पट्टेधारक शेतकऱ्यांना जमीन दिली. मात्र सदर जमिनीची मशागत करण्यासाठी पैसा व साहित्य नसल्याने शेतकऱ्यांचा विकास रखडला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे, खते तसेच फळबाग लागवड योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी भामरागड यांच्या मार्फतीने भामरागड तालुक्यातील २२ लाभार्थ्यांना बी-बियाणे, खते देण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. एस. राचेलवार, तालुका कृषी अधिकारी राऊत, विस्तार अधिकारी आत्राम, एल. डी. टांगसेलवार, कृषी पर्यवेक्षक रणदिवे उपस्थित होते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला ५ हजार रूपये मर्यादेपर्यंतचे धानाचे बियाणे, खते यांचा पुरवठा करण्यात आला. पीक लागवडीसाठी सर्वात मोठा खर्च बियाणे व खतांवर होतो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने खते व बियाणे या दोघांचीही व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांचा बराच उत्पादन खर्च कमी झाला आहे. भामरागड हा तालुका जिल्ह्यातील सर्वात दुर्गम व अविकसित तालुका म्हणून ओळखल्या जातो. या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सदर शेतकरी महागडे बियाणे व खते खरेदी करू शकत नाही. परिणामी पारंपरिकरितीने शेती करावी लागते. या पद्धतीने शेती केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होत असला तरी उत्पादनही प्रचंड प्रमाणात घटते. उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. परिणामी दुसऱ्यावर्षीही शेती कसण्यासाठी पैसे राहत नाही, असे दृष्टचक्र निर्माण होते. या दृष्टच्रकातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे, अशी आशा शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)