शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सामंजस्याने पडला फी वाढीच्या वादावर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:04 IST

दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला.

ठळक मुद्दे‘प्लॅटिनम’च्या पालकांना दिलासा : संयुक्त पत्रपरिषदेत शेवट गोड झाल्याचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला. प्लॅटिनमच्या संचालकांनी नवीन शैक्षणिक सत्राची शुल्कवाढ रद्द करीत पालकांची बाजू सकारात्मकरित्या समजून घेतल्याने पालकांनी आता या प्रकरणात शाळेच्या भूमिकेबद्दल आम्हाला कोणताच आक्षेप नसल्याचे सांगत शेवट गोड झाल्याचा आनंद व्यक्त केला.शनिवारी प्लॅटिनम ज्युबिली शाळेत पालकांचे प्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन झालेला घटनाक्रम मांडला. यावेळी पालकांचे प्रतिनिधी संजय राऊत, राजेश चिलमलवार, अरुण सातपुते, प्रशांत मुपीडवार, रेवनाथ लांजेवार, विजया मने, संगीता राऊत, तसेच शाळेच्या वतीने सचिव अझिज नाथानी, संचालक राजू देवानी, प्राचार्य रहीम आमलानी, उपप्राचार्य सोहन मंगर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.शुल्कवाढीवरून उद्भवलेल्या असंतोषाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्यानंतर हा विषय शिक्षण विभाग व जि.प. पदाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचला. शुक्रवारी शेवटची बैठक झाली. त्यात २०१८-१९ या वर्षाकरिता केली जाणारी १० टक्के शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय २०१७-१८ मध्ये वाढविलेल्या फीमधील काही फी कमी करण्याचे ठरले. तसेच पहिली ते दहावीपर्यंत नियमित शिकत असताना पुन्हा प्रवेश फी न घेण्यावरही सहमती झाली.यावेळी अझिज नाथानी यांनी सांगितले की, गडचिरोलीसारख्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांना वेळोवेळी योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई-दिल्लीवरून प्रशिक्षक बोलविले जातात. पण कोणतेही अतिरिक्त शुल्क पालकांकडून घेतले जात नाही. तरीही गोरगरीब पालकांचा विचार करून पालकांच्या भावनेचा आदर आम्ही राखल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरण शांत करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती पालकांनी दिली.दिलगिरी व्यक्तगडचिरोलीसारख्या ठिकाणी चांगले शिक्षण दुसरीकडे कुठे मिळत नाही याची आम्हाला कल्पना आहे. आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे म्हणूनच आम्ही थोडा आर्थिक भुर्दंड पडत असतानाही शाळेतून पाल्यांना काढले नाही, असे सांगत पालकांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. येथील शैक्षणिक गुणवत्ता पुढेही कायम राहील असा विश्वास करीत त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.