शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

धानोरा मार्गाच्या वाहतुकीसाठी भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:31 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देरस्त्यात अनेकदा होतो बिघाड : वायफाय सेवा निकामीच, परिवहन महामंडळाचे कमालीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २७ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोली-धोनारा मार्गावर प्रवाशांना आला.राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची गडचिरोली-धानोरा-गडचिरोली ही सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धानोरा येथे ५ वाजता पोहोचताच या बसगाडीमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी धानोरावरून गडचिरोलीकडे जाणाºया ३५ ते ४० प्रवाशांना अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी वाहनांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागला. सदर बस गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर चंद्रपूरकडे शेड्युल असल्यामुळे ही बस वेळेवर सुटू शकली नही. त्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर बस चंद्रपूरकरिता गडचिरोली येथून ६.१५ वाजता सुटणार होती. मात्र बिघाड निर्माण झाल्याने ही बस मार्गस्थ करण्यात आली नाही. त्यानंतर एमएच २० डी ९३६३ क्रमांकाची बस धानोरासाठी देण्यात आली. मात्र बसचालकाने सदर बस चालविण्यास नकार दिला. प्रशासनाने हीच बस घेऊन जा, असे सांगितले. सदर बस धानोरा फेरी आटोपल्यानंतर बदलवून देतो, असे चालकाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या बसमध्ये मोहडोंगरीजवळ बिघाड निर्माण झाला. बहुतांश बसगाड्यांची मर्यादा संपली असताना सुध्दा या बसगाड्या मार्गावर वाहतुकीवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळ प्रवाशांच्या जीवानिशी खेळ करीत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या अनेक बसगाड्यांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा असली तरी सेवा कुचकामी ठरली असून साहित्य निकामी ठरले आहेत. विशेष म्हणजे, सदर बसफेरीतील याच बसला यापूर्वी कोटगुल मार्गावरून येत असताना पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.ग्रामीण भागातील रस्ते पाहिजे त्या प्रमाणात सुस्थितीत नसल्याने तेथे खासगी वाहन वाहतुकीवर सोडले जात नाही, अशा वेळी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र बसगाड्यांच्या देखभालीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.आसने तुटलेली, तावदानेही दुरवस्थेतराज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसगाड्यांची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्यांमधील गादी गायब झाली आहे. शिवाय खिडक्यांचे तावदानेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय बसगाड्यांची नियमित योग्य प्रकारे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली व अहेरी आगारासाठी नव्या चांगल्या प्रकारच्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी मित्र मंडळांनी केली आहे.