शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धानोरा मार्गाच्या वाहतुकीसाठी भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:31 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देरस्त्यात अनेकदा होतो बिघाड : वायफाय सेवा निकामीच, परिवहन महामंडळाचे कमालीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २७ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोली-धोनारा मार्गावर प्रवाशांना आला.राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची गडचिरोली-धानोरा-गडचिरोली ही सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धानोरा येथे ५ वाजता पोहोचताच या बसगाडीमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी धानोरावरून गडचिरोलीकडे जाणाºया ३५ ते ४० प्रवाशांना अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी वाहनांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागला. सदर बस गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर चंद्रपूरकडे शेड्युल असल्यामुळे ही बस वेळेवर सुटू शकली नही. त्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर बस चंद्रपूरकरिता गडचिरोली येथून ६.१५ वाजता सुटणार होती. मात्र बिघाड निर्माण झाल्याने ही बस मार्गस्थ करण्यात आली नाही. त्यानंतर एमएच २० डी ९३६३ क्रमांकाची बस धानोरासाठी देण्यात आली. मात्र बसचालकाने सदर बस चालविण्यास नकार दिला. प्रशासनाने हीच बस घेऊन जा, असे सांगितले. सदर बस धानोरा फेरी आटोपल्यानंतर बदलवून देतो, असे चालकाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या बसमध्ये मोहडोंगरीजवळ बिघाड निर्माण झाला. बहुतांश बसगाड्यांची मर्यादा संपली असताना सुध्दा या बसगाड्या मार्गावर वाहतुकीवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळ प्रवाशांच्या जीवानिशी खेळ करीत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या अनेक बसगाड्यांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा असली तरी सेवा कुचकामी ठरली असून साहित्य निकामी ठरले आहेत. विशेष म्हणजे, सदर बसफेरीतील याच बसला यापूर्वी कोटगुल मार्गावरून येत असताना पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.ग्रामीण भागातील रस्ते पाहिजे त्या प्रमाणात सुस्थितीत नसल्याने तेथे खासगी वाहन वाहतुकीवर सोडले जात नाही, अशा वेळी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र बसगाड्यांच्या देखभालीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.आसने तुटलेली, तावदानेही दुरवस्थेतराज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसगाड्यांची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्यांमधील गादी गायब झाली आहे. शिवाय खिडक्यांचे तावदानेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय बसगाड्यांची नियमित योग्य प्रकारे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली व अहेरी आगारासाठी नव्या चांगल्या प्रकारच्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी मित्र मंडळांनी केली आहे.