शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

धानोरा मार्गाच्या वाहतुकीसाठी भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:31 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देरस्त्यात अनेकदा होतो बिघाड : वायफाय सेवा निकामीच, परिवहन महामंडळाचे कमालीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २७ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोली-धोनारा मार्गावर प्रवाशांना आला.राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची गडचिरोली-धानोरा-गडचिरोली ही सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धानोरा येथे ५ वाजता पोहोचताच या बसगाडीमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी धानोरावरून गडचिरोलीकडे जाणाºया ३५ ते ४० प्रवाशांना अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी वाहनांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागला. सदर बस गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर चंद्रपूरकडे शेड्युल असल्यामुळे ही बस वेळेवर सुटू शकली नही. त्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर बस चंद्रपूरकरिता गडचिरोली येथून ६.१५ वाजता सुटणार होती. मात्र बिघाड निर्माण झाल्याने ही बस मार्गस्थ करण्यात आली नाही. त्यानंतर एमएच २० डी ९३६३ क्रमांकाची बस धानोरासाठी देण्यात आली. मात्र बसचालकाने सदर बस चालविण्यास नकार दिला. प्रशासनाने हीच बस घेऊन जा, असे सांगितले. सदर बस धानोरा फेरी आटोपल्यानंतर बदलवून देतो, असे चालकाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या बसमध्ये मोहडोंगरीजवळ बिघाड निर्माण झाला. बहुतांश बसगाड्यांची मर्यादा संपली असताना सुध्दा या बसगाड्या मार्गावर वाहतुकीवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळ प्रवाशांच्या जीवानिशी खेळ करीत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या अनेक बसगाड्यांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा असली तरी सेवा कुचकामी ठरली असून साहित्य निकामी ठरले आहेत. विशेष म्हणजे, सदर बसफेरीतील याच बसला यापूर्वी कोटगुल मार्गावरून येत असताना पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.ग्रामीण भागातील रस्ते पाहिजे त्या प्रमाणात सुस्थितीत नसल्याने तेथे खासगी वाहन वाहतुकीवर सोडले जात नाही, अशा वेळी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र बसगाड्यांच्या देखभालीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.आसने तुटलेली, तावदानेही दुरवस्थेतराज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसगाड्यांची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्यांमधील गादी गायब झाली आहे. शिवाय खिडक्यांचे तावदानेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय बसगाड्यांची नियमित योग्य प्रकारे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली व अहेरी आगारासाठी नव्या चांगल्या प्रकारच्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी मित्र मंडळांनी केली आहे.