शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल सध्या थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देशाळांपुढे अडचणी : निकाल सादर करण्यासाठी शिक्षकांची धावपळ

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली तरी, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विहित मर्यादेत गुणपत्रिका देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने शाळांकडून ऑनलाईन माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाईन पाठविण्यासाठी सध्या शाळा व शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे. माहिती पाठविण्यास उशीर झाल्याने निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यास संबंधित शाळांना जाब विचारला जाणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल सध्या थंडबस्त्यात आहे.इयत्ता दहावीचा निकाल जाहीर व्हायचा असल्याने इयत्ता अकरावी व तत्सम वर्गाची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन व इतर अभ्यासक्रमाला कसे प्रवेश द्याचे हाही मुद्दा कायम आहे. मंत्रालय व सचिव स्तरावर याबाबत मंथन सुरू असून लवकरच निर्णय येणार आहे. सध्यास्थितीत इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. 

जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी

सराव परीक्षेचे ३० गुण, इयत्ता नववीच्या निकालातील ५० गुण व ताेंडी परीक्षेचे २० अशा एकूण १०० गुणांनुसार आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले आहे. मला मूल्यमापन, गुणदान करून निकाल तयार करताना फारशी अडचण आली नाही. विहीत वेळेत आपण आमच्या शाळांचा निकाल सादर केला आहे. मूल्यमापन याेग्यरित्या केले असून काेणावरही अन्याय केला नाही. - गिरिश मुंजमकर, शिक्षक, चामाेर्शी

अडचणी फारशा नाहीत, परंतु १७ नंबरचा फॉर्म भरणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याबाबत गुणांकन करताना तांत्रिक अडचणी निर्माण हाेत आहेत. या अडचणी आम्ही मंडळापर्यंत पाेहाेचविलेल्या आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला आहे. दुर्गम भागात ऑनलाईनची समस्या असल्याने अडचणी आल्या. मात्र त्यावर मात केली.- विलास मगरे, शिक्षक, जारावंडी

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल