शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी बंद पडली भीमनपायलीची शाळा

By admin | Updated: July 25, 2015 02:00 IST

जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे.

शिक्षकांचा गलथान कारभार : गावातील विद्यार्थी जातात दुसऱ्या गावीकुरखेडा : जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे. विशेष म्हणजे या गावातील विद्यार्थी दुसऱ्या गावी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. आदिवासीबहुल गाव असलेल्या भीमनपायली व आंबेटोला या दोन गावांसाठी १ जुलै २००८ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भीमनपायली या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू केली. या दोन्ही गावांची लोकसंख्या १३० च्या जवळपास आहे. दोन्ही गावे एकमेकांपासून जवळ असल्याने दोन गावांसाठी एक शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यापूर्वी भीमनपायली येथे वस्तीशाळा होती. या शाळेचे रूपांतर नियमित शाळेत करण्यात आले. शाळेची निर्मिती झाल्यापासून २०१२ पर्यंत ही शाळा चांगल्या पद्धतीने सुरू होती. शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र २०१२ च्या शैक्षणिक वर्षात दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर इतर शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे भीमनपायली येथे एकच शिक्षक कर्तव्यावर होता. सदर शिक्षक सुद्धा शाळेत नियमितपणे येत नव्हता. दोन वर्षांपूर्वी हा शिक्षक सुद्धा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर गेला. याबाबीला दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी कर्तव्यावर रूजू झाला नाही. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आलेल्या शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करून परत त्याला भीमनपायली शाळेत रूजू करण्यात घेण्यात आले. या सर्व भानगडीत शाळा एक महिना कुलूपबंद होती. परिणामी पालकांचा शाळेवरील विश्वास उडाला. शाळा कधीही बंद पडून पाल्यांचे नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना जवळपासच्या आश्रमशाळेत पाठविण्यात सुरुवात केली. परिणामी येथील विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली. २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात या शाळेत एकही विद्यार्थी शिल्लक राहिला नाही व नवीन विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतला नाही. त्यामुळे ग्रामसभा व शाळा व्यवस्थापन समितीने सदर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व येथील शिक्षकाला आणखी दुसऱ्या शाळेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आता बंद पडली आहे. शासनाच्या गाव तिथे शाळा या धोरणाला फार मोठा धक्का बसला असून सदर शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर शाळा नियमित शाळा सुरू राहील, असा विश्वास दर्शवावा लागेल, अशी मागणी गावातील पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)