शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विद्यार्थ्यांअभावी बंद पडली भीमनपायलीची शाळा

By admin | Updated: July 25, 2015 02:00 IST

जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे.

शिक्षकांचा गलथान कारभार : गावातील विद्यार्थी जातात दुसऱ्या गावीकुरखेडा : जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे. विशेष म्हणजे या गावातील विद्यार्थी दुसऱ्या गावी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. आदिवासीबहुल गाव असलेल्या भीमनपायली व आंबेटोला या दोन गावांसाठी १ जुलै २००८ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भीमनपायली या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू केली. या दोन्ही गावांची लोकसंख्या १३० च्या जवळपास आहे. दोन्ही गावे एकमेकांपासून जवळ असल्याने दोन गावांसाठी एक शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यापूर्वी भीमनपायली येथे वस्तीशाळा होती. या शाळेचे रूपांतर नियमित शाळेत करण्यात आले. शाळेची निर्मिती झाल्यापासून २०१२ पर्यंत ही शाळा चांगल्या पद्धतीने सुरू होती. शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र २०१२ च्या शैक्षणिक वर्षात दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर इतर शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे भीमनपायली येथे एकच शिक्षक कर्तव्यावर होता. सदर शिक्षक सुद्धा शाळेत नियमितपणे येत नव्हता. दोन वर्षांपूर्वी हा शिक्षक सुद्धा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर गेला. याबाबीला दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी कर्तव्यावर रूजू झाला नाही. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आलेल्या शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करून परत त्याला भीमनपायली शाळेत रूजू करण्यात घेण्यात आले. या सर्व भानगडीत शाळा एक महिना कुलूपबंद होती. परिणामी पालकांचा शाळेवरील विश्वास उडाला. शाळा कधीही बंद पडून पाल्यांचे नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना जवळपासच्या आश्रमशाळेत पाठविण्यात सुरुवात केली. परिणामी येथील विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली. २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात या शाळेत एकही विद्यार्थी शिल्लक राहिला नाही व नवीन विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतला नाही. त्यामुळे ग्रामसभा व शाळा व्यवस्थापन समितीने सदर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व येथील शिक्षकाला आणखी दुसऱ्या शाळेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आता बंद पडली आहे. शासनाच्या गाव तिथे शाळा या धोरणाला फार मोठा धक्का बसला असून सदर शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर शाळा नियमित शाळा सुरू राहील, असा विश्वास दर्शवावा लागेल, अशी मागणी गावातील पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)