शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणार

By admin | Updated: June 8, 2017 01:42 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशात कार्यविस्तारक योजनेद्वारे पंडित दीनदयाल यांचे विचार,

अशोक नेते यांची माहिती : बूथ सक्षमीकरणातून शेवटच्या माणसापर्यंत जागृती लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशात कार्यविस्तारक योजनेद्वारे पंडित दीनदयाल यांचे विचार, कार्य व पक्षाचे विचार तसेच विकास कामे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणार, अशी माहिती मंगळवारी चामोर्शी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे, रामेश्वर सेलुकर, रवी किरण समर्थ, नगरसेवक रमेश भुरसे, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, प्रकाश अर्जूनवार, पं.स. सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, दिलीप चलाख, मनमोहन बंडावार, जयराम चलाख, विनोद गौरकार, साईनाथ बुरांडे, राजू चुधरी, रेखा डोळस, सुभाष धोटे, विजय हटवार, सुशांत रॉय, माणिक कोहळे आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ‘वन बूथ टेन यूथ’ या माध्यमातून बूथ सक्षमीकरण करून शेवटच्या नागरिकापर्यंत आपण पूर्ण केलेली विकासकामे पोहोचविणार, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्याशिवाय योजनांचा उपयोग होत नाही. त्यामुळे हे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. कार्यविस्तार योजना ही २९ मे ते १२ जून यादरम्यान असून सहा महिने तसेच एक वर्षाकरिता विस्तारकांची नेमणूक व समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये युवक युवती व नागरिकांचा सहभाग असणार आहे, असे खासदार नेते यांनी यावेळी सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग व पाच बंधारे आदी विकासकामे मंजूर केली आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.