शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

टंचाई आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: April 8, 2015 01:12 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या १६ लाख ६३ हजार ५०० रूपयांच्या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला....

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या १६ लाख ६३ हजार ५०० रूपयांच्या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या १० गावे व तीन वाड्यांमध्ये १ लाख ४ हजार ४०० रूपयांतून प्रत्येकी एक विंधन विहीर उभारण्यात येणार आहे. भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या असलेल्या गाव व वाड्याची माहिती संकलीत करण्यात आली. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील १० गावे व तीन वाड्यांमध्ये पाणी टंचाई उपाययोजना करण्यासाठी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली असून पाणी टंचाई असलेल्या दहा गावे व तीन वाड्यांमध्ये लवकरच विंधन विहिरीचे काम जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित विंधन विहिरी बांधकामाचे प्रस्ताव अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली आहे. पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी एक लाख चार हजार ४०० रूपयांतून विंधन विहीर बांधण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावात पाणी टंचाई दिसून आली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात दहा गावे व तीन वाड्यांमध्ये पाणी टंचाईची सावट राहणार आहे. या गावातील पुरेशा पाण्याची सोय करण्यासाठी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या असली तरी आराखड्या त्या गावांचा नामोल्लेख नाही, हे विशेष. (स्थानिक प्रतिनिधी)