शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सावलखेडावासीयांनी थांबविली वृक्षतोड

By admin | Updated: February 10, 2016 01:53 IST

आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावलखेडा येथील कक्ष क्रमांक ३०, ३२ या नियत क्षेत्रातील सुमारे २० हेक्टरवरील वृक्षतोड

एफडीसीएमचा मनमानी कारभार : गौण वनोपजाची बेसुमार कत्तलवैरागड : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावलखेडा येथील कक्ष क्रमांक ३०, ३२ या नियत क्षेत्रातील सुमारे २० हेक्टरवरील वृक्षतोड करण्याचे काम मागील आठ दिवसांपासून वन विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यात मोठ्या वृक्षासह महत्त्वाच्या गौण वनोपजाची बेसुमार कत्तल केली जात आहे. या विरोधात सावलखेडाच्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एफडीसीएमच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार पुकारून वृक्षतोड थांबविली आहे. सावलखेडा उपवनक्षेत्रात वन विकास महामंडळाकडून कक्ष क्रमांक ३०, ३२ बिटात मागील आठ दिवसांपासून वृक्षतोड सुरू होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सावलखेडातील दीडशे ते दोनशे लोकांना जमाव घटनास्थळावर जाऊन वृक्षतोड करणाऱ्या लोकांना समजावून त्यांना परत पाठविले आणि वृक्षतोड थांबविली. त्यानंतर वन विकास महामंडळाचे अधिकारी गावात आले. त्यांनी वृक्षतोड झालेल्या भागात नव्याने रोपवन तयार करण्यात येईल, अशी माहिती दिली. मात्र गावकऱ्यांनी काहीही ऐकून न घेता वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. बेसुमार अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी सावलखेडा येथील गावकऱ्यांनी वनसंरक्षण समिती गठीत करून या समितीत प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य घेतला आहे. वन विकास महामंडळाकडून होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी १५ ते २० नागरिक समुहाने रोज गस्तीवर राहतात. सन २०१५ चा ग्राम वन कायदा रद्द करण्यासाठी सावलखेडावासीयांनी पुढाकार घेतला होता. अखेर सरकारला सदर कायदा रद्द करावा लागला. (वार्ताहर)