शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

क्षतिग्रस्त पुलामुळे साबांविने बस वाहतूक नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 01:28 IST

अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते.

एसटीचे उत्पन्न बुडणार : व्यंकटापूर येथील महाशिवरात्रीच्या जत्रेपासून भाविक राहणार वंचित विवेक बेझलवार   अहेरी अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते. मात्र देवलमारीचा पूल क्षतिग्रस्त झाला असल्याने देवलमारी पुलावरून प्रवासी वाहतूक वाहनचालकाच्या काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. या संदर्भातील पत्र साबांविने राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराला दिले असल्याने अहेरी आगाराने महाशिवरात्रीच्या यात्रेला सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिणामी बस सुविधेअभावी व्यंकटापूर येथील जत्रेपासून परिसरातील हजारो भाविक वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त व्यंकटापूर येथे तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. गेल्या दहा वर्षांपासून अहेरी आगारातर्फे देवलमरी पुलावरून बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र आता देवलमरीचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून क्षतिग्रस्त झाला आहे. सद्य:स्थितीला अनुसरूण सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पूल प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे पत्र न देता सदर पूल क्षतिग्रस्त झाल्याने वाहन चालकाच्या स्वत:च्या काळजीपूर्वक अटीवर वाहन चालविण्यास समर्थता दाखविली आहे. अशा अटीपूर्ण पत्रामुळे राज्य परिवहन महांडळाच्या अहेरी आगाराने महाशिवरात्री यात्रेदरम्यान व्यंकटापूरकडे सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. महाशिवरात्री जत्रेनिमित्त कोणता तरी वळण मार्ग काढून व्यंकटापूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. व्यंकटापूर येथे यात्रास्थळी मागील वर्षी अहेरी आगरातर्फे सहा बसेस भाविकांच्या सुविधेसाठी सोडण्यात आल्या होत्या. ५० बसफेऱ्यांच्या माध्यमातून यात्रा काळात अहेरी आगाराला ४४ हजार ६३७ रूपयांचे उत्पन्न तीन दिवसात प्राप्त झाले होते. मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाहतुकीस योग्य असे प्रमाणपत्र देण्यात न आल्याने यंदा सदर यात्रास्थळी आम्ही बससेवा देऊ शकत नाही. - सी. डी. घाघरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांच्या पत्रातील उल्लेख उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अहेरी यांनी अहेरी-व्यंकटापूर-देवलमरी मार्गावर असलेल्या क्षतिग्रस्त पुलावरून बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर नाहरकत प्रमाणपत्र दिलेले होते. मात्र साबांविकडून ‘वाहतुकीस योग्य’ असा स्पष्ट अभिप्राय प्राप्त झाल्याशिवाय सदर मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येऊ नये, सदर पुलाच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत राहावा, जेणेकरून बसफेरी सुरू करता येईल, असा उल्लेख विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. अहेरी-व्यंकटापूर रस्त्यावर देवलमरीच्या पुढे क्षतिग्रस्त पूल असल्याने बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर एसटी आगाराने आठमाही बससेवा सुरू करण्यास या कार्यालयाची हरकत नाही, असे साबांविने अहेरी आगाराला पाठविलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात उल्लेख आहे.