शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

क्षतिग्रस्त पुलामुळे साबांविने बस वाहतूक नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 01:28 IST

अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते.

एसटीचे उत्पन्न बुडणार : व्यंकटापूर येथील महाशिवरात्रीच्या जत्रेपासून भाविक राहणार वंचित विवेक बेझलवार   अहेरी अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते. मात्र देवलमारीचा पूल क्षतिग्रस्त झाला असल्याने देवलमारी पुलावरून प्रवासी वाहतूक वाहनचालकाच्या काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. या संदर्भातील पत्र साबांविने राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराला दिले असल्याने अहेरी आगाराने महाशिवरात्रीच्या यात्रेला सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिणामी बस सुविधेअभावी व्यंकटापूर येथील जत्रेपासून परिसरातील हजारो भाविक वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त व्यंकटापूर येथे तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. गेल्या दहा वर्षांपासून अहेरी आगारातर्फे देवलमरी पुलावरून बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र आता देवलमरीचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून क्षतिग्रस्त झाला आहे. सद्य:स्थितीला अनुसरूण सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पूल प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे पत्र न देता सदर पूल क्षतिग्रस्त झाल्याने वाहन चालकाच्या स्वत:च्या काळजीपूर्वक अटीवर वाहन चालविण्यास समर्थता दाखविली आहे. अशा अटीपूर्ण पत्रामुळे राज्य परिवहन महांडळाच्या अहेरी आगाराने महाशिवरात्री यात्रेदरम्यान व्यंकटापूरकडे सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. महाशिवरात्री जत्रेनिमित्त कोणता तरी वळण मार्ग काढून व्यंकटापूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. व्यंकटापूर येथे यात्रास्थळी मागील वर्षी अहेरी आगरातर्फे सहा बसेस भाविकांच्या सुविधेसाठी सोडण्यात आल्या होत्या. ५० बसफेऱ्यांच्या माध्यमातून यात्रा काळात अहेरी आगाराला ४४ हजार ६३७ रूपयांचे उत्पन्न तीन दिवसात प्राप्त झाले होते. मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाहतुकीस योग्य असे प्रमाणपत्र देण्यात न आल्याने यंदा सदर यात्रास्थळी आम्ही बससेवा देऊ शकत नाही. - सी. डी. घाघरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांच्या पत्रातील उल्लेख उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अहेरी यांनी अहेरी-व्यंकटापूर-देवलमरी मार्गावर असलेल्या क्षतिग्रस्त पुलावरून बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर नाहरकत प्रमाणपत्र दिलेले होते. मात्र साबांविकडून ‘वाहतुकीस योग्य’ असा स्पष्ट अभिप्राय प्राप्त झाल्याशिवाय सदर मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येऊ नये, सदर पुलाच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत राहावा, जेणेकरून बसफेरी सुरू करता येईल, असा उल्लेख विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. अहेरी-व्यंकटापूर रस्त्यावर देवलमरीच्या पुढे क्षतिग्रस्त पूल असल्याने बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर एसटी आगाराने आठमाही बससेवा सुरू करण्यास या कार्यालयाची हरकत नाही, असे साबांविने अहेरी आगाराला पाठविलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात उल्लेख आहे.