शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी

By admin | Updated: June 14, 2017 01:46 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात

दहावीचा निकाल ८५.४९ टक्के : नम्रता रायपुरे प्रथम तर चामोर्शीची वैदवी आणि आरमोरीची साक्षी द्वितीय लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात गडचिरोली जिल्ह्याने ८५.४९ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. गडचिरोलीच्या बियाणी विद्यानिकेतन विद्यालयाची नम्रता देवेंद्र रायपुरे हिने ९६.६० गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातून अव्वल स्थानी असणाऱ्या तीनही मुलीच आहेत हे विशेष. यासोबतच चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालयाची वैदवी गोपाल सिंगरेड्डीवार आणि आरमोरीच्या हितकारणी विद्यालयाची साक्षी दुर्वास बुद्धे या दोन मुलींनी सारखेच ९५.८० टक्के गुण पटकावून द्वितीय स्थान मिळविले. गडचिरोलीच्या शिवाजी हायस्कूलचा मयूर निळकंठ भांडेकर आणि चामोर्शीच्या कारमेल अकादमीच्या आयुष संतोष सुरावार यांनी ९५.६० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळविले आहे. यावर्षी म.रा.माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून १६ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १३ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ हजार २२५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५ हजार १५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ हजार ३४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुकानिहाय निकालावर एक नजर टाकल्यास सर्वात चांगला निकाल सिरोंचा तालुक्यात लागला आहे. या तालुक्यातील ८७.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वात कमी (६८.९३ टक्के) निकाल भामरागड तालुक्याचा लागला आहे. या परीक्षेला जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी चामोर्शी तालुक्यातून बसले होते. त्यात मुले १५८३ मुले आणि १४११ मुली होत्या. जिल्हाभरात ३३५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात गडचिरोली शहरातील ६ शाळा असून उर्वरित २९ शाळा ग्रामीण भागातील आहेत हे विशेष. दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. निकालाची उत्सुकता सर्वांना असल्यामुळे ग्रामीण भागात निकाल पाहण्यासाठी इंटरनेटसह स्मार्टफोनधारकांना चांगला चांगला भाव आला होता.