शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी

By admin | Updated: June 14, 2017 01:46 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात

दहावीचा निकाल ८५.४९ टक्के : नम्रता रायपुरे प्रथम तर चामोर्शीची वैदवी आणि आरमोरीची साक्षी द्वितीय लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात गडचिरोली जिल्ह्याने ८५.४९ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. गडचिरोलीच्या बियाणी विद्यानिकेतन विद्यालयाची नम्रता देवेंद्र रायपुरे हिने ९६.६० गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातून अव्वल स्थानी असणाऱ्या तीनही मुलीच आहेत हे विशेष. यासोबतच चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालयाची वैदवी गोपाल सिंगरेड्डीवार आणि आरमोरीच्या हितकारणी विद्यालयाची साक्षी दुर्वास बुद्धे या दोन मुलींनी सारखेच ९५.८० टक्के गुण पटकावून द्वितीय स्थान मिळविले. गडचिरोलीच्या शिवाजी हायस्कूलचा मयूर निळकंठ भांडेकर आणि चामोर्शीच्या कारमेल अकादमीच्या आयुष संतोष सुरावार यांनी ९५.६० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळविले आहे. यावर्षी म.रा.माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून १६ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १३ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ हजार २२५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५ हजार १५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ हजार ३४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुकानिहाय निकालावर एक नजर टाकल्यास सर्वात चांगला निकाल सिरोंचा तालुक्यात लागला आहे. या तालुक्यातील ८७.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वात कमी (६८.९३ टक्के) निकाल भामरागड तालुक्याचा लागला आहे. या परीक्षेला जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी चामोर्शी तालुक्यातून बसले होते. त्यात मुले १५८३ मुले आणि १४११ मुली होत्या. जिल्हाभरात ३३५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात गडचिरोली शहरातील ६ शाळा असून उर्वरित २९ शाळा ग्रामीण भागातील आहेत हे विशेष. दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. निकालाची उत्सुकता सर्वांना असल्यामुळे ग्रामीण भागात निकाल पाहण्यासाठी इंटरनेटसह स्मार्टफोनधारकांना चांगला चांगला भाव आला होता.