शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

महिलांच्या खात्यात १६ कोटींची बचत

By admin | Updated: January 30, 2016 01:55 IST

दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती

दिगांबर जवादे गडचिरोलीदुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सप्टेंबर २०१४ मध्ये महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली असून अवघ्या दीड वर्षात सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे. दूरच्या गावात असलेली बँक, नागरिकांमध्ये बँक व्यवहारांबाबत असलेले अज्ञान यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बँक खात्यांची संख्या अत्यंत कमी होती. वेळेवर एखाद्या शासकीय योजनेसाठी बँक खात्याची गरज पडल्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. विशेष करून महिलांचे बँक खाते अतिशय कमी प्रमाणात काढण्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे बँक खाते काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विशेष करून दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांचे खाते काढण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले. योजना सुरू झाल्यापासून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे. शेतमजुरी व इतर कामांचे पैसे गोळा झाल्यानंतर महिला वर्ग बँक खात्यामध्ये रक्कम जमा करतात. यामुळे महिलांना बचतीची सवय लागण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस पैशाचे काम पडल्यास बँक खात्यातून रक्कम काढली जात आहे. त्यामुळे वेळेवरच्या गरजेसाठी उधारवाडी करण्याची गरज पडत नाही. २५५ महिला बनल्या स्वावलंबी या योजनेच्या माध्यमातून बँक खाते काढलेल्या महिलेला कोणतेही तारण न घेता बचतीच्या दुप्पट अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या कर्जावर केवळ १२ टक्के व्याज आकारले जाते. त्यामुळे काही महिला बचत गटाकडून जास्त व्याजाचे कर्ज घेण्यापेक्षा बँकेकडून कर्ज घेण्यास पसंती दर्शवित आहेत. दीड वर्षात सुमारे २५५ महिलांनी कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय थाटला आहे. व्यवसायाबरोबरच घरगुती कामासाठीसुध्दा कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या असून त्यांना बचतीची सवय लागली आहे. कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनतमहिलांचे बँक खाते काढण्यासाठी दुर्गम व ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आले होते. महिलांना बँक खात्याचे महत्त्व पटवून देऊन बँक खाते काढण्याची जबाबदारी प्रत्येक शाखेच्या कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्दीष्टही देण्यात आले होते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी महिलांना प्रोत्साहित केल्याने अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत महिलांचे ५४ हजार ६४८ बँक खाते काढण्यात आले आहेत.बँक व्यवहारांविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बँक खाते काढल्यामुळे महिलांना बचत करण्यासही प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यात प्रत्येक महिलेचे बँक खाते असावे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रयत्नरत आहे. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली