शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान पाठ सोडेना

By admin | Updated: November 1, 2014 22:53 IST

महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत

गडचिरोली : महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून १४ नोव्हेंबर (बालक दिन) ते १९ नोव्हेंबर (जागतिक शौचालय दिन) या कालावधीत आणखी स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फार मोठी तारंबळ उडाली आहे. स्वच्छतेचे महत्व कळावे, त्याचबरोबर रोगांना आळा घालता यावा, यासाठी केंद्र शासनाने २ आॅक्टोबरपासून स्वच्छता अभियान संपूर्ण देशात राबविण्यास सुरूवात केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांनी स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली गेली. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही दिसून आला.स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. हा टप्पा बालक दिनापासून सुरूवात होऊन जागतिक शौचालय दिनाला संपणार आहे. यामध्ये १४ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी काढणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, १५ नोव्हेंबर रोजी मुनादीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे, १६ नोव्हेंबर रोजी वर्तमान पत्रामध्ये बातमी देणे, शाळेमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देणे, १७ नोव्हेंबर रोजी खुल्या जागेवर शौचास करण्यास बंदी आणणे, ज्या परिसरात बाहेर शौचास करण्याचे प्रमाण जास्त तिथे जास्त प्रमाणात जनजागृती करणे, यासाठी नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेणे, १८ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणे, साफसफाईचे वेळापत्रक तयार करून नागरिकांना साफसफाईचे व आरोग्यविषयक महत्व समजावून सांगणे, १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करून शौचालयाचे व आरोग्याचे महत्व समजावून सांगणे, शौचालय प्रत्येक घरी बांधण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी कार्यक्रम राबविण्याचे सक्त निर्देश प्रत्येक कार्यालयाला तसेच शाळेला देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली आहे. (नगर प्रतिनिधी)