शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

अहेरीत गरजू महिलांना साडी वाटप

By admin | Updated: September 26, 2015 01:17 IST

धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी ....

१० जणांचे रक्तदान : विमा योजनेसाठी पाच हजार अर्ज स्वीकारलेअहेरी : धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी यांच्या उपस्थितीत राजमहालाच्या विस्तीर्ण पटांगणावर शुक्रवारी अहेरी येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी गरजू गरीब महिलांना साडी वाटप राणी रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नाविसचे युवानेते कुमार अवधेशरावबाबा, प्रविणरावबाबा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राजमाता रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते पंतप्रधान सुरक्षा बंधन विमा योजनेचे उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी मोटार सायकल परवाना, लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विमा सुरक्षा योजनेंतर्गत पाच हजार नागरिकांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले. या कार्यक्रमाला अहेरी उपविभागातील पाच तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी राणी रूक्मिणीदेवी यांनी आपले दोन्ही सुपूत्र जनसेवेसाठी आपण अर्पण केले आहे व आपल्या प्रत्येकाचे दु:ख दूर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन केले. राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या आईने आपल्याला सत्य व जनसेवेचा मार्ग दाखविला. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्परतेने काम करू, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन कृष्णा मंचार्लावार तर आभार प्रकाश गुडेल्लीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)