शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

भंडारा जिल्ह्यातून देसाईगंज तालुक्यात रेती तस्करीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

तालुक्यात बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेती तस्करीला उधाण आले असुन चक्क शासकीय कामांवर देखील विना रॉयल्टी रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने सदर रेती तस्करी व वाहतुकीस प्रशासकीय यंत्रणेचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकूण २० ग्रामपंचायतींच्या ३९ गावात मोठ्या प्रमाणात सीसी रोड, नाल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम तसेच इतरही शासकीय बांधकामे धडाक्यात सुरु आहेत.

ठळक मुद्देपौनी नदी घाटाची रेती देसाईगंजात; प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह; तालुकाभरात खुलेआम वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वैनगंगा नदी घाटाचे लिलाव झाले नसताना भंडारा जिल्ह्याच्या पौनी वैनगंगा नदी घाटावरून चक्क टिप्परच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करून चढ्या दराने विक्री केली जात आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी मात्र याबाबत कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तालुक्यात बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेती तस्करीला उधाण आले असुन चक्क शासकीय कामांवर देखील विना रॉयल्टी रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने सदर रेती तस्करी व वाहतुकीस प्रशासकीय यंत्रणेचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकूण २० ग्रामपंचायतींच्या ३९ गावात मोठ्या प्रमाणात सीसी रोड, नाल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम तसेच इतरही शासकीय बांधकामे धडाक्यात सुरु आहेत. अद्यापही नदी घाटांचे लिलाव झाले नाही. असे असताना भंडारा जिल्ह्याच्या पौनी वैनगंगा नदी घाटावरून देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा सुरु आहे. याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष झाले आहे. पाणी कुठे तरी मुरत असल्याच्या शंकेला दुजोरा देऊ लागले आहेत.विशेष बाब अशी की रेती घाटांचे लिलावच झाले नसताना देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांत रेती,गीट्टी पुरवठ्याचे दुकान लावुन अनेक दलाल चोरीची रेती पुरवठा करण्याचा गोरखधंदा सुरू आहे.रात्रभर टिप्परची वर्दळमहसूल यंत्रणा संर्तक आहे हे दाखविण्यासाठी एखादा ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र देसाईगंज शहरात रात्रभर रेतीने भरलेल्या टिप्परची वर्दळ राहत असताना अजूनपर्यंत एकाही टिप्परवर कारवाई केली नाही. प्रशासकीय यंत्रणेला टिप्पर रेती तस्करी करतेवेळी मिळत नाही काय की प्रशासकीय यंत्रणेचे हात बांधण्यात आले आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :sandवाळू