शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘त्या’ मृत बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देचंद्रपुरातून येणार अहवाल : वन विभागाची अधिकृत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुरूंझानजीकच्या पाल नदीच्या परिसरात चुरचुरा कक्ष क्रमांक ३ मध्ये मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या अवयवाचे नमुने चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली.१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला. वडसा वन विभागाचे एसीएफ बी.व्ही. कांबळे, पोर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी एम.चांगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके व वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे पाच ते सहा नमुने व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे, असे वडसा वन विभागाचे एसीएफ बी. व्ही. कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या अंदाजानुसार रानडुकराचे मांस खाल्याने संसर्ग होऊन सदर बिबट्याचा मृत्यू झाला असावा. मात्र हा प्राथमिक अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.एका वाघिणीसह दोन बछड्यांचा वावरपोर्ला वन परिक्षेत्रात एक वाघीण व तिचे दोन बछडे संचार करीत असल्याचे दिसून आल्याने या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोर्ला-देलोडा मार्गावर पोर्लापासून चार किमी अंतरावर बुधवारी काही नागरिकांना वाघीण व तिच्या बछड्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे. वन विभागानेही या भागात वाघीण असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. गावात दवंडी देऊन व दर्शनी भागात फलक लावून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागातर्फे देण्यात आला आहे.सावंगी परिसरात बिबट्याची दहशतदेसाईगंज : देसाईगंजपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सावंगी परिसरातील टेकडी परिसरात नर व मादी बिबट आढळून येत आहे. मागील १५ दिवसांपासून बिबट्यांनी बस्तान मांडले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. बिबट्यांच्या या जोडीने गांधीनगर येथील जवळपास १० शेळ्यांचा फडशा पाडला आहे. गावात बिबट येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री बाहेर निघण्यास नागरिक तयार होत नाही.कोंढाळा, कासवी परिसरातही पट्टेदार वाघ अनेकांना आढळून येत आहे. याच वाघाने कोंढाळा परिसरातील अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. कोंढाळा हे गाव देसाईगंज-आरमोरी मार्गावर येते. या परिसरातून प्रवास करताना प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ