शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

एसटी प्रवासासाठी तीच ती कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

काेराेनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीने प्रवास करण्याची ...

काेराेनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीने प्रवास करण्याची परवानी देण्यात आली आहे. दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना ई-पास आवश्यक करण्यात आले आहे. तसेच एसटीत बसतेवेळी ई-पास किंवा संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बरीच बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत नसल्याचे दिसून आले. जिल्हांतर्गत प्रवासासाठी मात्र काेणतेही बंधन नाहीत. नेमक्या काेणत्या कारणांसाठी ते गडचिराेली येथे आले हाेते किंवा इतर गावाला गेले हाेते याबाबत लाेकमतने बसस्थानकावरील प्रवाशांना विचारणा केली असता, अगदी क्षुल्लक कारणांसाठी नागरिक एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे.

बाॅक्स

प्रवाशांनी प्रवासाची सांगितलेली कारणे थक्क करणारी

-संचारबंदीमुळे घरीच राहावे लागत आहे. घरी बसून राहण्यापेक्षा नातेवाईकांकडे चार दिवस राहता येते. कामाच्या वेळेवर चार दिवस नातेवाईकाकडे थांबणे अशक्य हाेते. आता काम नाही त्यामुळे फिरून यायचे आहे.

- जवळच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने जावे लागत आहे. काेराेनाची भीती आहे मात्र काय करणार, लग्नाला जावेच लागते.

- गावचा दुकानदार अधिक किमतीने किमतीने किराणा विकतात. किराणा व भाजीपाला खरेदीसाठी गडचिराेली येथे आलाे हाेताे.

- माझे कुटुंब नागपूरला राहते. मी नाेकरी गडचिराेली जिल्ह्यात करताे. शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती केली आहे. आजपर्यंत कर्तव्यावर हाेताे. आज नागपूरला जात आहे.

बाॅक्स

पास किंवा कार्ड दाखविल्याशिवाय प्रवास नाही

गडचिराेली आगारातून दुसऱ्या जिल्ह्यातील नागपूर, चंद्रपूर व ब्रह्मपुरी याच ठिकाणी बस साेडल्या जात आहेत. या प्रवाशांकडे ई-पास किंवा अत्यावश्यक सेवेबाबतचे प्रमाणपत्र असल्याशिवाय बसमध्ये बसू दिले जात नाही.

बाॅक्स

सहाच मार्गांवर बस सुरू

संचारबंदीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. काही माेजकेच प्रवासी प्रवास करीत आहेत. रिकामे वाहन चालविण्यात काहीच अर्थ नसल्याने एसटी विभागाकडून काही माेजक्याच मार्गांवर बसेस साेडल्या जात आहेत. मुरूमगाव, कुरखेडा, चंद्रपूर, नागपूर, आष्टी, ब्रह्मपुरी याच मार्गावर एक ते दाेन फेऱ्या साेडल्या जात आहेत.