शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एसटी प्रवासासाठी तीच ती कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

काेराेनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीने प्रवास करण्याची ...

काेराेनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीने प्रवास करण्याची परवानी देण्यात आली आहे. दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना ई-पास आवश्यक करण्यात आले आहे. तसेच एसटीत बसतेवेळी ई-पास किंवा संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बरीच बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत नसल्याचे दिसून आले. जिल्हांतर्गत प्रवासासाठी मात्र काेणतेही बंधन नाहीत. नेमक्या काेणत्या कारणांसाठी ते गडचिराेली येथे आले हाेते किंवा इतर गावाला गेले हाेते याबाबत लाेकमतने बसस्थानकावरील प्रवाशांना विचारणा केली असता, अगदी क्षुल्लक कारणांसाठी नागरिक एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे.

बाॅक्स

प्रवाशांनी प्रवासाची सांगितलेली कारणे थक्क करणारी

-संचारबंदीमुळे घरीच राहावे लागत आहे. घरी बसून राहण्यापेक्षा नातेवाईकांकडे चार दिवस राहता येते. कामाच्या वेळेवर चार दिवस नातेवाईकाकडे थांबणे अशक्य हाेते. आता काम नाही त्यामुळे फिरून यायचे आहे.

- जवळच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने जावे लागत आहे. काेराेनाची भीती आहे मात्र काय करणार, लग्नाला जावेच लागते.

- गावचा दुकानदार अधिक किमतीने किमतीने किराणा विकतात. किराणा व भाजीपाला खरेदीसाठी गडचिराेली येथे आलाे हाेताे.

- माझे कुटुंब नागपूरला राहते. मी नाेकरी गडचिराेली जिल्ह्यात करताे. शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती केली आहे. आजपर्यंत कर्तव्यावर हाेताे. आज नागपूरला जात आहे.

बाॅक्स

पास किंवा कार्ड दाखविल्याशिवाय प्रवास नाही

गडचिराेली आगारातून दुसऱ्या जिल्ह्यातील नागपूर, चंद्रपूर व ब्रह्मपुरी याच ठिकाणी बस साेडल्या जात आहेत. या प्रवाशांकडे ई-पास किंवा अत्यावश्यक सेवेबाबतचे प्रमाणपत्र असल्याशिवाय बसमध्ये बसू दिले जात नाही.

बाॅक्स

सहाच मार्गांवर बस सुरू

संचारबंदीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. काही माेजकेच प्रवासी प्रवास करीत आहेत. रिकामे वाहन चालविण्यात काहीच अर्थ नसल्याने एसटी विभागाकडून काही माेजक्याच मार्गांवर बसेस साेडल्या जात आहेत. मुरूमगाव, कुरखेडा, चंद्रपूर, नागपूर, आष्टी, ब्रह्मपुरी याच मार्गावर एक ते दाेन फेऱ्या साेडल्या जात आहेत.