शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

कठड्यांअभावी चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता

चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर रात्री व दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

फूटपाथ वाढल्याने रहदारीस अडथळा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इंदिरा गांधी चौक परिसरात मार्गांवर फूटपाथ दुकानदारांनी विविध प्रकारच्या साहित्यांचे दुकान लावले आहे. त्यामुळे चौक परिसरात तसेच त्रिमूर्ती चौकात रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त आहे.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

सिरोंचा : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएल पासून वंचित आहेत.

अरुंद पूल दुरूस्त करण्याची मागणी

गुड्डीगुडम : सिरोंचा महामार्गावर नंदीगावजवळ अरुंद व ठेंगण्या स्वरूपाचा राल्लावागु नाल्यावर पूल आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीची मागणी होऊन संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावर जड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणचा पूल अरुंद असून तो कमी उंचीचा आहे. शिवाय या पुलावर कठड्यांची व्यवस्था नाही.

बेलगट्टा माल येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

चामोर्शी : तालुक्यातील घोट-चामोर्शी मार्गावरील बेलगट्टा माल येथे प्रवासी निवारा व हातपंप देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

अतिरिक्त वीज देयकाने नागरिक त्रस्त

एटापल्ली : ग्रामीण भागात कमी वीज वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे अधिक देयक आकारले जात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अतिरिक्त वीज देयकामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.