शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

कठड्यांअभावी चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता

चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर रात्री व दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

फूटपाथ वाढल्याने रहदारीस अडथळा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इंदिरा गांधी चौक परिसरात मार्गांवर फूटपाथ दुकानदारांनी विविध प्रकारच्या साहित्यांचे दुकान लावले आहे. त्यामुळे चौक परिसरात तसेच त्रिमूर्ती चौकात रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त आहे.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

सिरोंचा : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएल पासून वंचित आहेत.

अरुंद पूल दुरूस्त करण्याची मागणी

गुड्डीगुडम : सिरोंचा महामार्गावर नंदीगावजवळ अरुंद व ठेंगण्या स्वरूपाचा राल्लावागु नाल्यावर पूल आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीची मागणी होऊन संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावर जड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणचा पूल अरुंद असून तो कमी उंचीचा आहे. शिवाय या पुलावर कठड्यांची व्यवस्था नाही.

बेलगट्टा माल येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

चामोर्शी : तालुक्यातील घोट-चामोर्शी मार्गावरील बेलगट्टा माल येथे प्रवासी निवारा व हातपंप देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

अतिरिक्त वीज देयकाने नागरिक त्रस्त

एटापल्ली : ग्रामीण भागात कमी वीज वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे अधिक देयक आकारले जात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अतिरिक्त वीज देयकामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.