शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोवर ८३ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:37 IST

१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअकुशल कामांवर भर : २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवसांचा रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने शेतीच्या भरवशावरच थोडाफार रोजगार येथील मजुरांना उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीसुद्धा वर्षभर कसली जात नाही. पावसाळ्याच्या कालावधीत केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतीच्या भरवशावर केवळ चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर सुमारे आठ महिने कोणताही रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेतमजूर व अल्पभुधारक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी केली जाते. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामाची मागणी वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याने या कालावधीत रोहयो प्रशासनातर्फे कामांचे नियोजन करून ठेवले जाते. कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जाते.१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामांवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा रोजगार हमी योजनेचा आहे. त्यामुळे एकूण खर्चाच्या सुमारे ६० टक्के खर्च मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मागील दहा महिन्यात मजुरांच्या मजुरीवर सुमारे ४७ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. कामासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे व कुशल कामांवर सुमारे ३१ कोटी २० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. एकुण खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण ३९.५९ टक्के एवढे आहे. रोहयो प्रशासनावर तीन कोटी ९४ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे रोहयोचे अंदाजपत्रक सुमारे ५२ कोटी २१ लाख रूपयांचे होते. मागील दहा महिन्यांच्या कालावधीत २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. तर महिला मजुरांच्या कामाचे प्रमाण ४७.६३ टक्के एवढे आहे. प्रत्येक कुटुंबाला सरासरी ३३.६५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.सरासरी २०५.६३ रूपये मजुरीरोजगार हमी योजनेचे काम करताना मजुरी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मजुराला त्याच्या कामाप्रमाणे मजुरी मिळाली नाही तर तो त्या कामावर न येता त्याऐवजी दुसरे काम शोधत असतो. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना बाहेरच्या मजुरीच्या तुलनेत जास्त मजुरी मिळणे आवश्यक आहे. रोजगार हमी वरील मजुराला त्याच्या कामानुसार मजुरी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २०५.६३ रूपये एवढी प्रत्येक दिवसाची मजुरी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर व्यवसायातील मजुरीचे दर बघितले तर रोहयोच्या मजुरीचे दर सर्वसाधारण चांगले असल्याने रोहयोच्या कामास मजूर पसंती देतात.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीरोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात गडचिरोली जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून येते. २०१३-१४ या वर्षात रोजगार हमी योजनेवर सुमारे ६२ कोटी ६९ लाख रूपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ मध्ये ९८ कोटी ४२ लाख, २०१५-१६ मध्ये १३२ कोटी ४७ लाख, २०१६-१७ मध्ये १३६ कोटी १३ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामावर अधिकचा खर्च होत असल्याचे दिसून येते. मजुरांची मजुरी वेळेवर उपलब्ध करून देण्यातही गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे. रोहयोच्या नियमानुसार आठवडा संपताच संबंधित मजुराची मजुरी त्याच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. सुमारे ७१.७ टक्के मजुरी १५ दिवसांच्या आत देण्यात आली आहे.