शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तेंदूपत्त्यातून १८ कोटींची रॉयल्टी

By admin | Updated: June 12, 2017 00:59 IST

चालू वर्षात सिरोंचा तालुक्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन केले आहे.

अधिकचा भाव : सिरोंचा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींनी केले तेंदू संकलननागभूषणम चकिनारपुवार । लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चालू वर्षात सिरोंचा तालुक्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन केले आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून ग्रामसभांना सुमारे १८ कोटी ११ लाख २ हजार ७२ रूपयांची रॉयल्टी प्राप्त झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीत जवळपास २० पट वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यात उत्तम दर्जाचा तेंदूपत्ता आहे. त्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलनेत सिरोंचा तालुक्यातील तेंदूपत्त्याला कंत्राटदारांची विशेष मागणी राहत असून अधिकचा भाव देण्यास ते तयार होतात. पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे तेंदूपत्त्यातून प्राप्त होणारे पूर्ण उत्पन्न खर्च व मजुरांची मजुरी वजा जाता ग्रामसभेला उपलब्ध होते. या उत्पन्नातून अनेक ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. या रकमेतून कोणती विकास कामे करायची, याचा पूर्ण अधिकार ग्रामसभेला राहते. तेंदूपत्त्याचा हंगाम जवळपास १० ते १२ दिवस चालते. यातून स्थानिक मजुरांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होते. १० ते १२ दिवसांच्या रोजगारात प्रती व्यक्ती १० ते १२ हजार रूपये उत्पन्न उपलब्ध होते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडतात. मागील वर्षी पहिल्यांदाच तेंदूपत्ता संकलन ग्रामसभांच्या मार्फत करण्यात आले. अनेक ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचा व तेंदूपत्त्याचा भाव माहित नसल्याने काही कंत्राटदारांनी स्थानिक नागरिकांची दिशाभूल करून अत्यंत कमी किमतीत तेंदूपत्ता संकलन केले. यावर्षी मात्र वन विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिल्याशिवाय तेंदूपत्त्याची विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामसभांना दिले होते. जाहिरातीमुळे कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढून मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १२ पटीने अधिक भाव मिळाला आहे. यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला आहे. उत्पादनही अधिक झाले. परिणामी रॉयल्टीमध्ये वाढ झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच १८ कोटींची रॉयल्टी मिळाली आहे.१५ कोटींनी उत्पन्न वाढलेमागील वर्षी ३५ ग्रामपंचायतींनी सुध्दा तेंदूपत्ता संकलन केले होते. या माध्यमातून केवळ ३० लाख ४२ हजार १५७ रूपयांची रॉयल्टी उपलब्ध झाली होती. यावर्षी मात्र तेंदूपत्ताचा भाव कडाडला होता. काही ठिकाणी १९ हजार रूपये प्रती गोणीपर्यंत भाव गेला. तेलंगणा राज्यातील कंत्राटदारांनी तेंदू संकलनासाठी स्पर्धा निर्माण केली होती. परिणामी यावर्षी १८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत १५ कोटी १७ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्न वाढले आहे.