शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचे 134 काेटी रुपये वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी १६ महिन्यांपासूनचे वीजबिल भरलेच नाही

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गावातील पथदिव्यांचे सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकले असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. घरगुती ग्राहकांकडेही सुमारे १५ काेटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणमार्फत दिला जात आहे. दरवर्षी गावांमधील पथदिव्यांचे वीजबिल शासनामार्फत भरले जात हाेते. ग्रामपंचायती पंचायत समितीकडे वीजबिल सादर करीत हाेते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत शासनाकडे वीजबिल पाठविले जात हाेते. शासनाकडूनच वीजबिल भरले जात असल्याने पथदिव्यांच्या वीजबिलाचा त्रास ग्रामपंचायतीला राहत नव्हता. मात्र या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरूज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

शासनाने मागितली पथदिव्यांची बिलेराज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली. 

घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे. - व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज