शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

पथदिव्यांचे 134 काेटी रुपये वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी १६ महिन्यांपासूनचे वीजबिल भरलेच नाही

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गावातील पथदिव्यांचे सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकले असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. घरगुती ग्राहकांकडेही सुमारे १५ काेटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणमार्फत दिला जात आहे. दरवर्षी गावांमधील पथदिव्यांचे वीजबिल शासनामार्फत भरले जात हाेते. ग्रामपंचायती पंचायत समितीकडे वीजबिल सादर करीत हाेते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत शासनाकडे वीजबिल पाठविले जात हाेते. शासनाकडूनच वीजबिल भरले जात असल्याने पथदिव्यांच्या वीजबिलाचा त्रास ग्रामपंचायतीला राहत नव्हता. मात्र या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरूज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

शासनाने मागितली पथदिव्यांची बिलेराज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली. 

घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे. - व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज