शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

पथदिव्यांचे 134 काेटी रुपये वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी १६ महिन्यांपासूनचे वीजबिल भरलेच नाही

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गावातील पथदिव्यांचे सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकले असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. घरगुती ग्राहकांकडेही सुमारे १५ काेटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणमार्फत दिला जात आहे. दरवर्षी गावांमधील पथदिव्यांचे वीजबिल शासनामार्फत भरले जात हाेते. ग्रामपंचायती पंचायत समितीकडे वीजबिल सादर करीत हाेते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत शासनाकडे वीजबिल पाठविले जात हाेते. शासनाकडूनच वीजबिल भरले जात असल्याने पथदिव्यांच्या वीजबिलाचा त्रास ग्रामपंचायतीला राहत नव्हता. मात्र या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरूज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

शासनाने मागितली पथदिव्यांची बिलेराज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली. 

घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे. - व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज