शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मतदानासाठी लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:27 IST

२४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

ठळक मुद्दे८० टक्के मतदान : चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे निवडणूक शांततेत आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जिल्हाभरात जवळपास सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे.एकूण २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी कोरची तालुक्यातील बोगाटोला, धानोरा तालुक्यातील नवरगाव, ग्रामपंचायतीत अविरोध निवड झाली. त्यामुळे या दोन ठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरित २४ ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी मतदान घेण्यात आले. एकूण मतदान केंद्रांपैकी २६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व २३ मतदान केंद्र संवेदनशील होते. तर २८ मतदान केंद्र सर्वसाधारण आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. एवढेच नव्हे तर पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्यांची ने-आण करण्यात आली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मतदान करण्यासाठी सातत्याने आवाहन केल्याने मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. काही गावांमध्ये सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून येत होते.नक्षलग्रस्त भाग असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान ठेवण्यात आले. सायंकाळपर्यंत पोलिंग पार्ट्या तहसील कार्यालयात पोहोचल्या. सर्व ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी घोषित केला जाणार आहे. सरपंचपदाची पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे मतदान मोजणी केंद्रावर प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.अन् प्रशासकीय यंत्रणा झाली ‘स्विच्ड आॅफ’ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान आटोपले. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील केंद्रांवरील कर्मचारी सुरक्षितपणे आपल्या मुख्यालयी पोहोचेपर्यंत आणि मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करेपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे होते. परंतु या निवडणुकीची जबाबदारी असणारे निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे नायब यांचे मोबाईल सायंकाळपासून बंद होते. रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी नायक सुटीवर असल्याने मतदानाची टक्केवारी त्यांनाही माहीत नव्हती.