शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बसेसच्या छताला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:19 IST

शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.

ठळक मुद्देअहेरी आगाराचे दुर्लक्ष : प्रवाशांना छत्री उघडून बसावे लागते आसनांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.अहेरी उपविभागात जोरदार पाऊस सुरू आहे. परंतु दररोज कर्तव्यावर अथवा कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना बसमधून प्रवास करावा लागतो. सध्या अहेरी आगाराच्या अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. परंतु या बसेसची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. अनेक बसेसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांना एकतर उभे राहावे लागते किंवा बसमध्ये छत्री उघडी करून बसावे लागते. प्रवासी बसमधून प्रवास करीत असतांना आवश्यक प्रवासभाडे देऊनही त्यांना योग्य सोयी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कपडे व साहित्य भिजतातएटापल्ली, सिरोंचा व भामरागड सारख्या दुर्गम भागात सोडण्यात येणाºया बसेसच्या छतातून पाणी गळते. पाणी आसनांवर पडून ती ओली होतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके भिजतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आगाराने बसच्या छतांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. परंतु दुर्लक्षच झाले.