शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दलालांकडून कामगारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:01 IST

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.

ठळक मुद्देअटल विश्वकर्मा योजनेची नोंदणी : प्रत्येक अर्जासाठी घेतले जाताहेत एक हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.बांधकाम क्षेत्रात काम करणाºया मजुरांसाठी शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, पाठबंधारे, रंगकाम, सूतार काम, नाली बांधणी, ईलेक्ट्रिक, अग्नीशमन यंत्रणा, विटांचे काम, सौरऊर्जेशी निगडीत काम, फेब्रीकेशनची कामे आदी क्षेत्रात काम करणाºया मजुरांना या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगार विभागात नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी ज्या कंत्राटदाराकडे संबंधित मजुराने काम केले आहे. त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, फोटो आवश्यक आहेत. नोंदणी करण्यासाठी मजुरांची गर्दी उसळत आहे. याचा गैरफायदा घेण्यासाठी दलाल तयार झाले आहेत. संबंधित मजुराला एका अर्जामागे एक हजार ते दीड हजार रुपये मागून त्याची नोंदणी करून देण्याचे आश्वासन देत आहेत. वास्तविक संबंधित दलालाचा नोंदणीशी काहीही संबंध नाही.आजपर्यंत तालुकास्तरावर व मोठ्या गावात नोंदणी शिबिर घेतले जात होते. या शिबिरांमध्ये सदर गर्दी उसळत असल्याने कामगार कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना अर्ज ठेवण्यास सांगत होते. याचा फायदा घेत संबंधित दलाल नागरिकांकडून आणलेले अर्ज ठेवून मोकळे होत होते. नोंदणी झालेल्या मजुराचा कार्ड बनत होता. त्यानंतर त्याला साहित्य व पैशाचाही लाभ होत होता. हा सर्व लाभ आपल्यामुळेच झाला, असे सांगून संबंधित दलाल कामगारांकडून पैसे उखडत आहेत. कामगारांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.आता जिल्हास्तरावरच होणार नोंदणीतालुकास्तरावरील नोंदणी शिबिरे बंद करण्यात आली आहेत. आता केवळ जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय गडचिरोली येथेच नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी वर्षभर चालू राहणार आहे. नोंदणीसाठी सोमवार व बुधवार हे दोन दिवस ठरविण्यात आले आहेत. मंगळवारी कार्डांचे नुतनीकरण होईल. गुरूवारी अर्थसहाय्यासाठी अर्ज स्वीकारले जातील. कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. अर्जाची नोंदणी झाल्यानंतर अर्थसहाय्याचा अर्ज भरावा लागतो. त्यानंतरच पाच हजार रुपये अनुदान प्राप्त होते. काही मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र त्यांनी अर्थसहाय्याचा अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नाही.