शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दलालांकडून कामगारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:01 IST

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.

ठळक मुद्देअटल विश्वकर्मा योजनेची नोंदणी : प्रत्येक अर्जासाठी घेतले जाताहेत एक हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.बांधकाम क्षेत्रात काम करणाºया मजुरांसाठी शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, पाठबंधारे, रंगकाम, सूतार काम, नाली बांधणी, ईलेक्ट्रिक, अग्नीशमन यंत्रणा, विटांचे काम, सौरऊर्जेशी निगडीत काम, फेब्रीकेशनची कामे आदी क्षेत्रात काम करणाºया मजुरांना या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगार विभागात नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी ज्या कंत्राटदाराकडे संबंधित मजुराने काम केले आहे. त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, फोटो आवश्यक आहेत. नोंदणी करण्यासाठी मजुरांची गर्दी उसळत आहे. याचा गैरफायदा घेण्यासाठी दलाल तयार झाले आहेत. संबंधित मजुराला एका अर्जामागे एक हजार ते दीड हजार रुपये मागून त्याची नोंदणी करून देण्याचे आश्वासन देत आहेत. वास्तविक संबंधित दलालाचा नोंदणीशी काहीही संबंध नाही.आजपर्यंत तालुकास्तरावर व मोठ्या गावात नोंदणी शिबिर घेतले जात होते. या शिबिरांमध्ये सदर गर्दी उसळत असल्याने कामगार कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना अर्ज ठेवण्यास सांगत होते. याचा फायदा घेत संबंधित दलाल नागरिकांकडून आणलेले अर्ज ठेवून मोकळे होत होते. नोंदणी झालेल्या मजुराचा कार्ड बनत होता. त्यानंतर त्याला साहित्य व पैशाचाही लाभ होत होता. हा सर्व लाभ आपल्यामुळेच झाला, असे सांगून संबंधित दलाल कामगारांकडून पैसे उखडत आहेत. कामगारांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.आता जिल्हास्तरावरच होणार नोंदणीतालुकास्तरावरील नोंदणी शिबिरे बंद करण्यात आली आहेत. आता केवळ जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय गडचिरोली येथेच नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी वर्षभर चालू राहणार आहे. नोंदणीसाठी सोमवार व बुधवार हे दोन दिवस ठरविण्यात आले आहेत. मंगळवारी कार्डांचे नुतनीकरण होईल. गुरूवारी अर्थसहाय्यासाठी अर्ज स्वीकारले जातील. कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. अर्जाची नोंदणी झाल्यानंतर अर्थसहाय्याचा अर्ज भरावा लागतो. त्यानंतरच पाच हजार रुपये अनुदान प्राप्त होते. काही मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र त्यांनी अर्थसहाय्याचा अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नाही.