शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांमुळे विकासाला गती मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:24 IST

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम होणार आहे. उद्योजक उद्योगाची निर्मिती करताना

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : गडचिरोली-आष्टी, गडचिरोली-मूल राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम होणार आहे. उद्योजक उद्योगाची निर्मिती करताना सर्व प्रथम दळणवळण, ऊर्जा याबाबी लक्षात घेतात. रस्त्यांच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे मार्ग खुले होतील. उद्योजक उद्योग स्थापण्यासाठी तयार होतील. गावात रस्ता गेला तर गावाला शिक्षण, आरोग्याच्या सुविधेसोबतच बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. त्याचा फायदा शहरालासुध्दा होतो. राष्ट्रीय महामार्ग असेल तर त्या भागात उद्योगाचे दालन, व्यवसाय, व्यापार आदी गोष्टी वाढण्यास मदत होते. तसेच असा भाग इतर भागासोबत जोडला जातो व रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. त्यामुळे रस्ते हे सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने गडचिरोली ते मूल, गडचिरोली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार मितेश भांगडीया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रेखा डोळस, भाजपचे गडचिरोली शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, रवींद्र ओल्लालवार, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात राज्यात रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले होते. याचे श्रेय नितीन गडकरींना जाते. त्यांच्या नेतृत्वात राज्याचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आता सुरू झाले. सुरुवातीच्या काळात नागपूरवरून गडचिरोलीला जाण्याकरीता चार-पाच तासांचा वेळ लागत होता. तर नागपूरवरून सिरोंचा येथे जाण्यासाठी पूर्ण दिवस जात होता. मात्र आता आपण नागपूरवरून गडचिरोलीला केवळ अडीच तासात पोहचू शकतो. केवळ नागपूर - गडचिरोलीच नाही तर अहेरी, सिरोंचा आदी दुर्गम भागातील रस्तेसुध्दा युती सरकारच्या काळात झाले आहे. विकासाकरीता कनेक्टीव्हिटीची गरज असते. गडचिरोलीत १२ हजार कोटी रुपयांचे रस्ते होत आहेत, याचा आनंद आहे. सर्व रस्त्यांच्या माध्यमातून विकास करणे शक्य आहे. रस्ते झाले तर येथे उद्योग येतील. उद्योगांना मूलभूत गरजा जसे रस्ते, पाणी, वीज आदी गोष्टी उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात वनोपजांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी रामदेव बाबा यांना या भागात बोलाविण्यात येणार आहे. त्यांनीसुध्दा त्यास होकार दिल्यामुळे आता युवकांच्या हातांना काम मिळू शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्रीपद या भागात आल्यामुळे नामदार हंसराज अहिर यांच्या प्रयत्नातून ३ हजार कोटी रुपयांचा विशेष आराखडा या भागासाठी तयार करण्यात आला आहे. गोदावरी नदीवरील पूल हे राज्यातील सर्वाधिक लांबीचे पूल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले की, गरीब जनतेला रोटी, कपडा, मकान या गोष्टी उपलब्ध होतील तेव्हाच देशाचा विकास होईल. याबाबीवर केंद्र शासनाचा विश्वास असून त्यानुसार केंद्र शासन योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. गरीबांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. गडचिरोली जिल्हा हा साधन संपत्तीने श्रीमंत असला तरी या जिल्ह्याच्या विकासाकडे आजपर्यंतच्या सरकारचे दुर्लक्ष झाले. भाजप सरकार मात्र विशेष लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन गडकरी दिले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याला १२ कोटी रूपये उपलब्ध होत होते. आता मात्र १२ हजार कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. केंद्र व राज्य शासनातील सर्वच मंत्री गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम करीत असल्याने या जिल्ह्याच्या विकासासाठी ते प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत येथील गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना इतर जिल्ह्यातील नागरिक भित होते. आता मात्र याच राष्ट्रीय महामार्गावरून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग व्यापार करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील लोक येतील, असे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना रस्त्यांच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उत्तरांचल व जम्मू-काश्मीर राज्याच्या धरतीवर कर सवलत देण्यात यावी, अशी मागणी उपस्थित मंत्र्यांकडे खासदारांनी केली. आमदार डॉ. होळी यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय द्यावे, गोंडवाना विद्यापीठाला जागा उपलब्ध करून द्यावी, योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवी अधिकारी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाला जवळपास १० हजारवर नागरिक उपस्थित होते. गडचिरोली बायपाससाठी २०० कोटींचा निधी गडचिरोली शहरातून चारही मुख्य मार्ग जातात. त्यामुळे शहरात नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. रस्ते दुरूस्ती व राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी शासनाने १२ हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. मात्र यामध्ये गडचिरोली शहरातील बायपास मार्गाचा समावेश नाही. बाब प्रकर्षाने खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. शहराच्या विकासासाठी बायपास मार्ग असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन नामदार गडकरी यांनी बायपाससाठी अतिरिक्त २०० कोटी रूपये मंजूर केले आहेत. सदर बायपास मार्ग गडचिरोलीच्या बाहेरून १३ किमी अंतराचा राहणार आहे. सदर बायपास मार्ग चारही राष्ट्रीय महामार्गाला गडचिरोली शहराच्या बाहेरून जोडणार आहे. बायपास मार्गामुळे गडचिरोली शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.