शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:01 IST

कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे.

ठळक मुद्देआवागमनासाठी अडचण : नाल्याजवळ दोन्ही बाजूने साचला कचरा

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात संततधार पाऊस झाल्याने तसेच पूरपरिस्थितीमुळे अनेक डांबरी व खडीकरणाचे रस्ते खराब झाले. पुरामुळे गावागावाला जोडणारे रस्ते चिखलमय झाले असून नाल्याजवळ दोन्ही बाजूने कचरा साचला आहे. एकूणच सूर्यापल्ली भागातील रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे.२५ जुलैपासून ६ सप्टेंबरपर्यंत कमलापूर भागात पाऊस झाला. कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था होते. प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यानंतर दरवर्षी रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र ही डागडुजी तात्पुरत्या स्वरूपाची असते. त्यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकत नाही.गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पावसाने कहर केला. वर्षभराच्या पावसाने चार महिन्यांतच सरासरी गाठली. विशेष म्हणजे अहेरी उपविभागाच्या भामरागड, सिरोंचा व अहेरी या तीन तालुक्यात बऱ्याचदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने खडीकरण रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. शेताकडे जाणारे व गावागावाला जोडणारे कच्च्या स्वरूपाच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांचीही अशाच प्रकारे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा