शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्रकल्पाच्या पाण्याने दल्ली गावाचा रस्ता गडप

By admin | Updated: May 21, 2017 01:25 IST

तालुक्यातील दल्ली गावाला इतर गावांशी जोडणारा मुख्य मार्ग दोन वर्षांपासून जांभुळघाट लघु सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने गडप झाला आहे.

दुर्लक्षच : जंगलातून पायवाटेने जावे लागते लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील दल्ली गावाला इतर गावांशी जोडणारा मुख्य मार्ग दोन वर्षांपासून जांभुळघाट लघु सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने गडप झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शारीरिक कष्ट सहन करीत पायवाटेने जंगलातून मार्ग काढावा लागत आहे. मात्र प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. आंधळी (सोनपूर) ग्रा. पं. अंतर्गत येणारे दल्ली हे गाव चारही बाजूने घनदाट जंगलाने वेढलेले आहे. १५० ते २०० लोकसंख्या असून येथे १०० टक्के आदिवासी बांधव वास्तव्य करतात. मागील दोन वर्षापर्यंत हे गाव मालेवाडा-रामगड या मुख्य मार्गाशी डांबरीकरण झालेल्या रस्त्याशी जोडले होते. मात्र जांभुळघाट लघुसिंचन प्रकल्प येंगलखेडा या जलाशयाचे बांधकाम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. पाण्याची साठवणूक सुरू झाली. या जलाशयाच्या पाण्याने अंदाजे दोन किमी लांबीचा मार्ग पूर्णत: बाधीत होत या गावातील रस्ता पाण्यात गडप झाला. यामुळे ग्रामस्थांसमोर आवागमनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हापासून येथील ग्रामस्थ पायवाटेनेच मार्गक्रमण करून इतर गावांशी व्यवहार करतात. गतवर्षी रोहयो अंतर्गत दल्ली ते बामनपदेवपर्यंत माती काम करून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र सीडीवर्क, बोल्डर पिचिंग व मुरूम आदी कामे न झाल्याने हा मार्गही निरूपयोगी ठरला आहे. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने प्रकल्पबाधीतांच्या पुनर्वसनाकडेही पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. ही समस्या लक्षात घेऊन जि. प. चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट व विद्यमान जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी तत्काळ सर्वेक्षण करून दल्ली ते बामनपेठ रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे.