शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रेती वाहतुकीने रस्त्याची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:28 IST

सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला.

ठळक मुद्देवाहतुकीस अडथळा : राजन्नापल्ली मार्गावर बिघाड झालेला ट्रक उभा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. त्यामुळे सदर ट्रक तिथेच उभा ठेवण्यात आला आहे. परिणामी राजन्नापल्ली मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रेती भरलेल्या ओव्हरलोड ट्रकांच्या वाहतुकीने या रस्त्याची वाट लागली आहे.रेती भरलेला ट्रक पंक्चर झाल्याने सदर ट्रक शुक्रवारपासून राजन्नापल्ली मार्गावर उभा आहे. शनिवारी या ट्रकची दुरूस्ती सुरू होती. आरडा रेतीघाटावरून रेती वाहतुकीसाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आरडा गावातून तर दुसरा राजन्नापल्ली गावातून जातो. ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक आरडा गावातील मार्गावरून सर्रासपणे सुरू आहे. या दोन्ही गावातील नागरिकांचा गावातून जड वाहने आवागमनास विरोध आहे. मात्र प्रशासनाच्या बळजबरीने तसेच धाकाने व पोलिसांच्या कारवाईने नागरिकही हतबल आहेत.आरडा गावातील मार्गावरून डांबरी रस्त्याने ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. उखडलेल्या डांबरी मार्गावर कंत्राटदाराकडून मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. आरडा गावातील शाळेसमोरून रेती भरलेल्या ट्रकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका होण्याची शक्यताही नाकारताही येत नाही. ट्रकांच्या या आवागमनामुळे आरडा गावात येणारी महामंडळाची बस बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.ट्रकांच्या वाहतुकीमुळे आरडा गावातून शिक्षणासाठी तालुकास्थळी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आरडा व राजन्नापल्ली गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे.अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्याच्या राजन्नापल्ली व आरडा गावातील मार्गावरून ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गावातील दोन्ही मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच ट्रकांवर कारवाई करण्याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.