शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रेती वाहतुकीने रस्त्याची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:28 IST

सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला.

ठळक मुद्देवाहतुकीस अडथळा : राजन्नापल्ली मार्गावर बिघाड झालेला ट्रक उभा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. त्यामुळे सदर ट्रक तिथेच उभा ठेवण्यात आला आहे. परिणामी राजन्नापल्ली मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रेती भरलेल्या ओव्हरलोड ट्रकांच्या वाहतुकीने या रस्त्याची वाट लागली आहे.रेती भरलेला ट्रक पंक्चर झाल्याने सदर ट्रक शुक्रवारपासून राजन्नापल्ली मार्गावर उभा आहे. शनिवारी या ट्रकची दुरूस्ती सुरू होती. आरडा रेतीघाटावरून रेती वाहतुकीसाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आरडा गावातून तर दुसरा राजन्नापल्ली गावातून जातो. ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक आरडा गावातील मार्गावरून सर्रासपणे सुरू आहे. या दोन्ही गावातील नागरिकांचा गावातून जड वाहने आवागमनास विरोध आहे. मात्र प्रशासनाच्या बळजबरीने तसेच धाकाने व पोलिसांच्या कारवाईने नागरिकही हतबल आहेत.आरडा गावातील मार्गावरून डांबरी रस्त्याने ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. उखडलेल्या डांबरी मार्गावर कंत्राटदाराकडून मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. आरडा गावातील शाळेसमोरून रेती भरलेल्या ट्रकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका होण्याची शक्यताही नाकारताही येत नाही. ट्रकांच्या या आवागमनामुळे आरडा गावात येणारी महामंडळाची बस बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.ट्रकांच्या वाहतुकीमुळे आरडा गावातून शिक्षणासाठी तालुकास्थळी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आरडा व राजन्नापल्ली गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे.अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्याच्या राजन्नापल्ली व आरडा गावातील मार्गावरून ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गावातील दोन्ही मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच ट्रकांवर कारवाई करण्याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.