शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तिमरमच्या रस्त्यावर फूटभर चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:05 IST

अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : खडीकरणाअभावी नागरिकांना आवागमनास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तिमरम येथील रस्त्याची चार ते पाच वर्षांपासून अवस्था बकाल झाली आहे. या समस्येविषयी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूचित करण्यात आले. परंतु स्थानिक प्रशासनाने समस्या सोडविण्याकडे कानाडोळा केला. सरपंच व सचिवांकडे गावातील नागरिकांनी वेळोवेळी विनंती करून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी दखल घेतली नाही.विशेष म्हणजे या मार्गाने नागरिक गावातून तसेच शेताकडे ये-जा करीत असतात. परंतु सध्या रस्ता चिखलमय झाला आहे. एक ते दीड फूट चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने नागरिकांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो. तिमरम येथे ग्रामपंचायत असतानाही येथील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो. परंतु तो विकास कामांवर खरोखरच खर्च केला जातो काय, असा सवाल करीत सदर मार्गाचे खडीकरण करावे, अशी मागणी नागरिक नरेंद्र सडमेक, रमेश इष्टाम, रूपेश पेंदाम, सरय्या मडावी, नामदेव मडावी, सनू सडमेक, राकेश सडमेक, रवीकिरण कोडापे, खुशाल सिडाम यांनी केली आहे.आश्वासन हवेत विरलेमागील वर्षी या ठिकाणी गिट्टी व मुरूम टाकण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. रस्त्याच्या निर्मितीपासूनच खडीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली असतानाही ग्रामपंचायतीने मागणीकडे कानाडोळा केला.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती