शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात अडणार २२३ गावांचे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:08 IST

पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देपूरबाधित ४२ गावे : धान्य पुरवठा व आरोग्य सुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. याशिवाय पूरबाधित होणाऱ्या ४२ गावांना पुराचा वेढा पडल्यास त्यातून गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू सज्ज होत आहे.जिल्ह्यात दरवर्षी १३०० ते १४०० मिमी पाऊस पडतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसामुळे होणारे नुकसानही या जिल्ह्यात जास्त आहे. आधीच बारमाही रस्त्यांचा अभाव, ठेंगणे पूल किंवा अनेक ठिकाणी पूलच नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांमधून पैलतीर गाठणे दुर्गम भागातील नागरिकांना अशक्य होते. अशावेळी त्यांचा इतर प्रमुख गावांशी संपर्क तुटतो. अशा स्थितीत संबंधित गावातील नागरिकांना रेशनचे धान्य किंवा आरोग्य सुविधा गावातच मिळण्यासाठी चार महिन्यांचा साठा गावात पोहचविण्याची व्यवस्था केली जाते.पावसाळ्यात मार्ग बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ३७ तर अहेरी तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी पर्लकोटा नदीला अनेक वेळा पूर आल्यामुळे भामरागडमध्ये दोन वेळा नदीचे पाणी शिरले होते. पुलावरून पाणी वाहात असल्याने भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न अजून निकाली न निघाल्यामुळे यावर्षीही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.निवडणूक आचारसंहितेमुळे बेली ब्रिजचे काम पूर्ण न झाल्यामुळे पुलांची स्थिती जैसे थे आहे.गेल्यावर्षी पुरामुळे १० जणांचा मृत्यूगेल्या पावसाळ्यात विविध ठिकाणी आलेल्या पुरांनी १० जणांचा बळी घेतला. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन हाकण्याच्या प्रयत्नात किंवा पायी पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात पुराच्या पाण्यात २५ जण वाहून गेले. तसेच वीज पडून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने गेल्यावर्षी वीज पडून कोणीही दगावले नाही. याशिवाय ६ वर्षात ७७६ जनावरांनाही मृत्यूमुखी पडावे लागले.पूर परिस्थितीमुळे बाधित होणारी संभावित गावेगडचिरोली तालुका : शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुका : येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुका : मार्र्कं डादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुका : वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुका : देसाईगंज, विसोरा, सावंगी (लाडज), अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुका : कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुका : वांगेपल्ली, गडअहेरी, गडअहेरी बामणी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुका : हिंदूर, हिक्केर, झारेवाडा,भामरागड तालुका : भामरागड, सिरोंचा तालुका : मृदुकृष्णापूर, मोयाबिनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर.

टॅग्स :floodपूर