शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

पावसाळ्यात अडणार २२३ गावांचे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:08 IST

पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देपूरबाधित ४२ गावे : धान्य पुरवठा व आरोग्य सुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. याशिवाय पूरबाधित होणाऱ्या ४२ गावांना पुराचा वेढा पडल्यास त्यातून गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू सज्ज होत आहे.जिल्ह्यात दरवर्षी १३०० ते १४०० मिमी पाऊस पडतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसामुळे होणारे नुकसानही या जिल्ह्यात जास्त आहे. आधीच बारमाही रस्त्यांचा अभाव, ठेंगणे पूल किंवा अनेक ठिकाणी पूलच नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांमधून पैलतीर गाठणे दुर्गम भागातील नागरिकांना अशक्य होते. अशावेळी त्यांचा इतर प्रमुख गावांशी संपर्क तुटतो. अशा स्थितीत संबंधित गावातील नागरिकांना रेशनचे धान्य किंवा आरोग्य सुविधा गावातच मिळण्यासाठी चार महिन्यांचा साठा गावात पोहचविण्याची व्यवस्था केली जाते.पावसाळ्यात मार्ग बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ३७ तर अहेरी तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी पर्लकोटा नदीला अनेक वेळा पूर आल्यामुळे भामरागडमध्ये दोन वेळा नदीचे पाणी शिरले होते. पुलावरून पाणी वाहात असल्याने भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न अजून निकाली न निघाल्यामुळे यावर्षीही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.निवडणूक आचारसंहितेमुळे बेली ब्रिजचे काम पूर्ण न झाल्यामुळे पुलांची स्थिती जैसे थे आहे.गेल्यावर्षी पुरामुळे १० जणांचा मृत्यूगेल्या पावसाळ्यात विविध ठिकाणी आलेल्या पुरांनी १० जणांचा बळी घेतला. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन हाकण्याच्या प्रयत्नात किंवा पायी पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात पुराच्या पाण्यात २५ जण वाहून गेले. तसेच वीज पडून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने गेल्यावर्षी वीज पडून कोणीही दगावले नाही. याशिवाय ६ वर्षात ७७६ जनावरांनाही मृत्यूमुखी पडावे लागले.पूर परिस्थितीमुळे बाधित होणारी संभावित गावेगडचिरोली तालुका : शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुका : येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुका : मार्र्कं डादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुका : वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुका : देसाईगंज, विसोरा, सावंगी (लाडज), अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुका : कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुका : वांगेपल्ली, गडअहेरी, गडअहेरी बामणी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुका : हिंदूर, हिक्केर, झारेवाडा,भामरागड तालुका : भामरागड, सिरोंचा तालुका : मृदुकृष्णापूर, मोयाबिनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर.

टॅग्स :floodपूर