शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पावसाळ्यात अडणार २२३ गावांचे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:08 IST

पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देपूरबाधित ४२ गावे : धान्य पुरवठा व आरोग्य सुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. याशिवाय पूरबाधित होणाऱ्या ४२ गावांना पुराचा वेढा पडल्यास त्यातून गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू सज्ज होत आहे.जिल्ह्यात दरवर्षी १३०० ते १४०० मिमी पाऊस पडतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसामुळे होणारे नुकसानही या जिल्ह्यात जास्त आहे. आधीच बारमाही रस्त्यांचा अभाव, ठेंगणे पूल किंवा अनेक ठिकाणी पूलच नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांमधून पैलतीर गाठणे दुर्गम भागातील नागरिकांना अशक्य होते. अशावेळी त्यांचा इतर प्रमुख गावांशी संपर्क तुटतो. अशा स्थितीत संबंधित गावातील नागरिकांना रेशनचे धान्य किंवा आरोग्य सुविधा गावातच मिळण्यासाठी चार महिन्यांचा साठा गावात पोहचविण्याची व्यवस्था केली जाते.पावसाळ्यात मार्ग बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ३७ तर अहेरी तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी पर्लकोटा नदीला अनेक वेळा पूर आल्यामुळे भामरागडमध्ये दोन वेळा नदीचे पाणी शिरले होते. पुलावरून पाणी वाहात असल्याने भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न अजून निकाली न निघाल्यामुळे यावर्षीही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.निवडणूक आचारसंहितेमुळे बेली ब्रिजचे काम पूर्ण न झाल्यामुळे पुलांची स्थिती जैसे थे आहे.गेल्यावर्षी पुरामुळे १० जणांचा मृत्यूगेल्या पावसाळ्यात विविध ठिकाणी आलेल्या पुरांनी १० जणांचा बळी घेतला. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन हाकण्याच्या प्रयत्नात किंवा पायी पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात पुराच्या पाण्यात २५ जण वाहून गेले. तसेच वीज पडून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने गेल्यावर्षी वीज पडून कोणीही दगावले नाही. याशिवाय ६ वर्षात ७७६ जनावरांनाही मृत्यूमुखी पडावे लागले.पूर परिस्थितीमुळे बाधित होणारी संभावित गावेगडचिरोली तालुका : शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुका : येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुका : मार्र्कं डादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुका : वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुका : देसाईगंज, विसोरा, सावंगी (लाडज), अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुका : कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुका : वांगेपल्ली, गडअहेरी, गडअहेरी बामणी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुका : हिंदूर, हिक्केर, झारेवाडा,भामरागड तालुका : भामरागड, सिरोंचा तालुका : मृदुकृष्णापूर, मोयाबिनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर.

टॅग्स :floodपूर