शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नदीपात्र कोरडे; धान पीक करपले

By admin | Updated: April 29, 2015 01:40 IST

जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते.

मानापूर/ देलनवाडी : जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते. तसेच उन्हाळी हंगामातही धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीघाटावर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. परंतु खोब्रागडी नदीपात्र कोरडे झाल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान लागवडीचे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विविध जातींच्या धानाची लागवड करीत असतात. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र धान लागवडीखाली असतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या रबी हंगामात बहुतांश शेतकरी तैलवर्गीय तसेच डाळ वर्गीय पिकांची लागवड करतात. त्यानंतर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात बहुतांश शेतकरी मध्यमप्रतिच्या धानाची लागवड करतात. मानापूर परिसरातील देलनवाडी, मानापूर, सुकाळा, मोहझरी तसेच वैरागड परिसरातील करपडा, लोेहारा आदी गावांसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या पीक जोमात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवेही येत आहेत. परंतु नदीचे पात्र आटत असल्याने धानपीक अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीत पंप लावून शेतीला पाण्याची व्यवस्था केली. परंतु नदीतील पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने शेतीला पाणी पुरवठा करतांना अडचणी येत आहेत. परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे विहीर अथवा अन्य जलस्त्रोत नाहीत. असे शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी प्रणाली राबवावी, अशी मागणी होत आहे. पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने नदी पात्रात निर्माण करण्यात आलेले पंप पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहेत. याचा फटका शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाला बसत आहे. अनेक शेतातील धानपीक करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यास आडकाठी येत आहे. (वार्ताहर)