शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

नदीपात्र कोरडे; धान पीक करपले

By admin | Updated: April 29, 2015 01:40 IST

जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते.

मानापूर/ देलनवाडी : जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते. तसेच उन्हाळी हंगामातही धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीघाटावर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. परंतु खोब्रागडी नदीपात्र कोरडे झाल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान लागवडीचे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विविध जातींच्या धानाची लागवड करीत असतात. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र धान लागवडीखाली असतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या रबी हंगामात बहुतांश शेतकरी तैलवर्गीय तसेच डाळ वर्गीय पिकांची लागवड करतात. त्यानंतर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात बहुतांश शेतकरी मध्यमप्रतिच्या धानाची लागवड करतात. मानापूर परिसरातील देलनवाडी, मानापूर, सुकाळा, मोहझरी तसेच वैरागड परिसरातील करपडा, लोेहारा आदी गावांसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या पीक जोमात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवेही येत आहेत. परंतु नदीचे पात्र आटत असल्याने धानपीक अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीत पंप लावून शेतीला पाण्याची व्यवस्था केली. परंतु नदीतील पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने शेतीला पाणी पुरवठा करतांना अडचणी येत आहेत. परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे विहीर अथवा अन्य जलस्त्रोत नाहीत. असे शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी प्रणाली राबवावी, अशी मागणी होत आहे. पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने नदी पात्रात निर्माण करण्यात आलेले पंप पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहेत. याचा फटका शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाला बसत आहे. अनेक शेतातील धानपीक करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यास आडकाठी येत आहे. (वार्ताहर)