शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

धोका पत्करून वीज केली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:43 IST

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी परिस्थितीनुसार वीज दुरूस्तीच्या कामाला लागतात. अशावेळी नागरिकांना वीज सुरळीत होण्याची प्रतीक्षा असते.

ठळक मुद्देविद्युत कर्मचाºयांचे काम : गडचिरोली-आरमोरी वाहिनीवरील अडपल्लीत बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी परिस्थितीनुसार वीज दुरूस्तीच्या कामाला लागतात. अशावेळी नागरिकांना वीज सुरळीत होण्याची प्रतीक्षा असते. परंतु उन्ह, वारा, पावसातही महावितरणचे कर्मचारी कठिण परिस्थितीतही वीज पुरवठा सुरळीत करतात. याचाच प्रत्यय अडपल्ली (गोगाव) येथे नुकताच आला. विद्युत कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून तलावातील पाण्यात असलेल्या खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत केला.गडचिरोली विभागातील गोगाव (अडपल्ली) येथे ३३ केव्ही वीज वाहिनी तुटून पडली. या वादळाने व वीज व वीज पडल्याने जवळपास १७ इन्सुलेटर्स तुटले. आरमोरी उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता ए. व्ही. तुपकर यांनी गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के व गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात इन्सुलेटर्स बदलून वीज पुरवठा सुरळीत केला. परंतु काही ठिकाणी वीज पडल्यामुळे इन्सुलेटर्स तुटले नाही. परंतु कमजोर झाले. ते बदलविणे आवश्यक होते. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता ए. व्ही. तुपकर, कनिष्ठ अभियंता आशिष बोरकर, वीज कर्मचारी दीपक चौधरी, दुधराम चौधरी, मंगेश बोरकर यांनी कामगारांसोबत तलावातील पाण्यातून वीजखांब गाठून दुरूस्तीचे काम केले. सदर काम करीत असताना कामगारांच्या मानेपर्यंत पाणी होते. असे असतानाही विषारी कीटक, सरपटणारे यांची कसलीही पर्वा न करता कामगारांनी वीज दुरूस्तीचे काम केले.जिल्ह्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात वीज दुरूस्तीचे काम वीज कर्मचारी करतात. कधी दुर्गम जंगलात रानटी श्वापदांची भीती बाळगली जात नाही. तर पावसाळ्यात पुराच्या पाण्याचीही पर्वा कर्मचारी करीत नाही व अविरतपणे वीज दुरूस्तीचे काम करतात. यातून कर्मचाºयांनाही कामाचे समाधान मिळते.