शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

दुर्गम गावानींही मागितले ग्रामसभांना अधिकार

By admin | Updated: November 8, 2014 22:37 IST

जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून

एटापल्ली : जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून हे अधिकार आमच्या गावालाही मिळाले पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे ग्रामसभा नक्षलग्रस्त गावांमध्येही सक्षम होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावातील नागरिकांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात बांबू विक्रीचे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावे, बांबूला प्रतीनग ५० रूपये व प्रती बिंड्डल २५० रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी भागात बांबू कटाईचा रोजगार हे आदिवासींसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे योग्य भाव देण्यात यावा, जेणेकरून आदिवासी नागरिकांची सावकार व व्यापारी वर्गांकडून आर्थिक पिडवणूक होणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. बियाणे, हिरडा, मोह, टोळी, आवळा, बेहडा, लाख, चारोळी, डिंक आदी वनोपजांना योग्य भाव देण्यात यावा, अशीही मागणी सुरजागड परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय संविधानानुसार पाचवी अनुसूची (अनुच्छेद २४४८१) अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती (आदिवासी) यांचे प्रशासन व नियंत्रणकरिता तरतुदीनुसार आदिवासी भागात शांती व सुशासन नांदण्यासाठी ग्रामसभेची भारतीय संविधानात विशेष विधी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. एटापल्लीचे नायब तहसीलदार गेडाम यांना निवेदन देतांना आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा, पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, मनोहर हिचामी आदी उपस्थित होते. या निवेदनावर राजू कोरसा, चंदू आत्राम, मैनू पुंगाटी, लाही कोरसा, लालचंद होळी, रामलू कोरच्या, मुनेश्वर पन्ना, दारासिंग तिर्की, दानू हिचामी, सन्नू पल्लो, जुगरू केरकेट्टा, टुलसा पुंगाटी, सूरज सरजू पुंगाटी आदींसह सुरजागड परिसरातील ७० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.