शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावानींही मागितले ग्रामसभांना अधिकार

By admin | Updated: November 8, 2014 22:37 IST

जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून

एटापल्ली : जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून हे अधिकार आमच्या गावालाही मिळाले पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे ग्रामसभा नक्षलग्रस्त गावांमध्येही सक्षम होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावातील नागरिकांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात बांबू विक्रीचे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावे, बांबूला प्रतीनग ५० रूपये व प्रती बिंड्डल २५० रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी भागात बांबू कटाईचा रोजगार हे आदिवासींसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे योग्य भाव देण्यात यावा, जेणेकरून आदिवासी नागरिकांची सावकार व व्यापारी वर्गांकडून आर्थिक पिडवणूक होणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. बियाणे, हिरडा, मोह, टोळी, आवळा, बेहडा, लाख, चारोळी, डिंक आदी वनोपजांना योग्य भाव देण्यात यावा, अशीही मागणी सुरजागड परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय संविधानानुसार पाचवी अनुसूची (अनुच्छेद २४४८१) अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती (आदिवासी) यांचे प्रशासन व नियंत्रणकरिता तरतुदीनुसार आदिवासी भागात शांती व सुशासन नांदण्यासाठी ग्रामसभेची भारतीय संविधानात विशेष विधी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. एटापल्लीचे नायब तहसीलदार गेडाम यांना निवेदन देतांना आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा, पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, मनोहर हिचामी आदी उपस्थित होते. या निवेदनावर राजू कोरसा, चंदू आत्राम, मैनू पुंगाटी, लाही कोरसा, लालचंद होळी, रामलू कोरच्या, मुनेश्वर पन्ना, दारासिंग तिर्की, दानू हिचामी, सन्नू पल्लो, जुगरू केरकेट्टा, टुलसा पुंगाटी, सूरज सरजू पुंगाटी आदींसह सुरजागड परिसरातील ७० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.