शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता.

ठळक मुद्देमहसूल विभागाचा पुढाकार : हिदूर व विसामुंडी येेथे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक शेतकरी व नागरिक अजूनही अज्ञानी आहेत. शेती व कृषीविषयक याेजनांबाबत या भागात फारशी जनजागृती नाही. परिणामी ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम हिदूर व विसामुंडी गावात फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात वारस फेरफाराचे ३३ अर्ज दाखल करण्यात आले. शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे शिबिर लांबणीवर पडले. काेराेना संदर्भात शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात शिबिर घेण्याचे निश्चित झाले. २१ डिसेंबर राेजी विसामुंडी व हिदूर येथे वारस फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रथम चावडी वाचन करण्यात आले.  त्यानंतर मय्यत व्यक्तीविषयी  चाैकशी  करण्यात आली.  वारस फेरफार घेण्यासाठी मय्यत  व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी चाैकशी पंजी व ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. हिदूर येथे १५ तर विसामुंडी येथील शिबिरात १८ असे एकूण ३३ अर्ज वारस फेरफारासाठी दाखल करण्यात आले.  हे सर्व अर्ज लवकर निकाली काढण्यात येतील, असे मंडळ अधिकारी गड्डम यांनी नागरिकांना सांगितले. 

प्रशासन नागरिकांच्या दारीभामरागडसारख्या दुर्गम भागात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाेहाेचत नाही. पाेहाेचले तरी धावती भेट  देऊन परत येतात. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तशाच कायम राहतात. मात्र महसूल विभागाच्या पुढाकाराने वारस शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट गावात व नागरिकांच्या दारी आल्याचे स्थानिकांना दिसून आले. या उपक्रमाचा लाेकांनी काैतुक केले.

 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र