शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता.

ठळक मुद्देमहसूल विभागाचा पुढाकार : हिदूर व विसामुंडी येेथे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक शेतकरी व नागरिक अजूनही अज्ञानी आहेत. शेती व कृषीविषयक याेजनांबाबत या भागात फारशी जनजागृती नाही. परिणामी ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम हिदूर व विसामुंडी गावात फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात वारस फेरफाराचे ३३ अर्ज दाखल करण्यात आले. शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे शिबिर लांबणीवर पडले. काेराेना संदर्भात शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात शिबिर घेण्याचे निश्चित झाले. २१ डिसेंबर राेजी विसामुंडी व हिदूर येथे वारस फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रथम चावडी वाचन करण्यात आले.  त्यानंतर मय्यत व्यक्तीविषयी  चाैकशी  करण्यात आली.  वारस फेरफार घेण्यासाठी मय्यत  व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी चाैकशी पंजी व ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. हिदूर येथे १५ तर विसामुंडी येथील शिबिरात १८ असे एकूण ३३ अर्ज वारस फेरफारासाठी दाखल करण्यात आले.  हे सर्व अर्ज लवकर निकाली काढण्यात येतील, असे मंडळ अधिकारी गड्डम यांनी नागरिकांना सांगितले. 

प्रशासन नागरिकांच्या दारीभामरागडसारख्या दुर्गम भागात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाेहाेचत नाही. पाेहाेचले तरी धावती भेट  देऊन परत येतात. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तशाच कायम राहतात. मात्र महसूल विभागाच्या पुढाकाराने वारस शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट गावात व नागरिकांच्या दारी आल्याचे स्थानिकांना दिसून आले. या उपक्रमाचा लाेकांनी काैतुक केले.

 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र