शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
3
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
4
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
5
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
6
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
7
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
8
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
9
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
10
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
11
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
12
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
13
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
14
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
15
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
16
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
17
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
18
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
19
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
20
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?

दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता.

ठळक मुद्देमहसूल विभागाचा पुढाकार : हिदूर व विसामुंडी येेथे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक शेतकरी व नागरिक अजूनही अज्ञानी आहेत. शेती व कृषीविषयक याेजनांबाबत या भागात फारशी जनजागृती नाही. परिणामी ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम हिदूर व विसामुंडी गावात फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात वारस फेरफाराचे ३३ अर्ज दाखल करण्यात आले. शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे शिबिर लांबणीवर पडले. काेराेना संदर्भात शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात शिबिर घेण्याचे निश्चित झाले. २१ डिसेंबर राेजी विसामुंडी व हिदूर येथे वारस फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रथम चावडी वाचन करण्यात आले.  त्यानंतर मय्यत व्यक्तीविषयी  चाैकशी  करण्यात आली.  वारस फेरफार घेण्यासाठी मय्यत  व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी चाैकशी पंजी व ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. हिदूर येथे १५ तर विसामुंडी येथील शिबिरात १८ असे एकूण ३३ अर्ज वारस फेरफारासाठी दाखल करण्यात आले.  हे सर्व अर्ज लवकर निकाली काढण्यात येतील, असे मंडळ अधिकारी गड्डम यांनी नागरिकांना सांगितले. 

प्रशासन नागरिकांच्या दारीभामरागडसारख्या दुर्गम भागात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाेहाेचत नाही. पाेहाेचले तरी धावती भेट  देऊन परत येतात. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तशाच कायम राहतात. मात्र महसूल विभागाच्या पुढाकाराने वारस शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट गावात व नागरिकांच्या दारी आल्याचे स्थानिकांना दिसून आले. या उपक्रमाचा लाेकांनी काैतुक केले.

 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र