शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता.

ठळक मुद्देमहसूल विभागाचा पुढाकार : हिदूर व विसामुंडी येेथे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक शेतकरी व नागरिक अजूनही अज्ञानी आहेत. शेती व कृषीविषयक याेजनांबाबत या भागात फारशी जनजागृती नाही. परिणामी ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम हिदूर व विसामुंडी गावात फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात वारस फेरफाराचे ३३ अर्ज दाखल करण्यात आले. शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत.  वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब  महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली.  त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर  घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे शिबिर लांबणीवर पडले. काेराेना संदर्भात शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात शिबिर घेण्याचे निश्चित झाले. २१ डिसेंबर राेजी विसामुंडी व हिदूर येथे वारस फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रथम चावडी वाचन करण्यात आले.  त्यानंतर मय्यत व्यक्तीविषयी  चाैकशी  करण्यात आली.  वारस फेरफार घेण्यासाठी मय्यत  व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी चाैकशी पंजी व ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. हिदूर येथे १५ तर विसामुंडी येथील शिबिरात १८ असे एकूण ३३ अर्ज वारस फेरफारासाठी दाखल करण्यात आले.  हे सर्व अर्ज लवकर निकाली काढण्यात येतील, असे मंडळ अधिकारी गड्डम यांनी नागरिकांना सांगितले. 

प्रशासन नागरिकांच्या दारीभामरागडसारख्या दुर्गम भागात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाेहाेचत नाही. पाेहाेचले तरी धावती भेट  देऊन परत येतात. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तशाच कायम राहतात. मात्र महसूल विभागाच्या पुढाकाराने वारस शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट गावात व नागरिकांच्या दारी आल्याचे स्थानिकांना दिसून आले. या उपक्रमाचा लाेकांनी काैतुक केले.

 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र