शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

कारवाईने राज्यभरातील आश्रमशाळांचे शिक्षक धास्तावले

By admin | Updated: May 8, 2014 23:47 IST

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन गडचिरोलीसह ...

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन गडचिरोलीसह राज्यभरातील प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीचा आश्रमशाळांचा निकाल कमी लावलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई केल्याची माहिती आहे. अधिकार्‍यांनी कारवाईचा सुड उगारल्यामुळे नागपूर विभागासह राज्यभरातील शासकीय तसेच खाजगी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक धास्तावले असल्याचे दिसून येते. सन २०११-१२ या सत्रात अध्यापन करणार्‍या विषय शिक्षक तसेच संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना निकालाचे अपेक्षीत उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र काही आश्रमशाळांचा २०१२ वर्षीचा निकाल पडला. यामुळे आदिवासी विकास विभागाच्या तत्कालीन आयुक्ताच्या आदेशावरून संबंधित प्रकल्प अधिकार्‍यांनी वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. अशा प्रकारचे अन्यायकारक परिपत्रक जिल्हा परिषद वा कुठल्याही शिक्षण विभागात नसल्याची माहिती आहे. शेकडो समस्यांचे माहेरघर असणार्‍या आश्रमशाळांचे निकाल ६० टक्क्यापर्यंत लावणे कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकांना चांगलेच जड जाते. गडचिरोली जिल्ह्यातील तिनही प्रकल्पातील तसेच राज्यातील अनेक शासकीय आश्रमशाळा दुर्गम भागात आहेत. या भागात भाषेचा प्रश्न कायमच आहे. पालकांचे अज्ञान, सोयीसुविधांचा अभाव व आदिवासी विद्यार्थ्यांची ढासळलेली मानसिकता यामुळे आश्रमशाळांचे निकाल ५० टक्क्यांच्या आतच लागतात. सदर परिपत्रक अन्यायकारक असून झालेली कारवाई द्वेषपूर्ण असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केला असून सदर कारवाई मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले आदिवासी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेऊन केलेली कारवाई मागे घ्यावी, तसेच यापुढे निकालाचे उद्दिष्ट देऊन कारवाई करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन आश्रमशाळांचे मुख्याधापक व शिक्षकांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)