शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संपामुळे 10 काेटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले. या कालावधीत गडचिराेली व अहेरी आगारांचे सुमारे १० काेटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. काेराेनापूर्वी गडचिराेली आगाराला दररोज ९ लाख ५० हजार रूपये तर अहेरी आगाराला ७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र, संपामुळे या संपूर्ण उत्पन्नावर पाणी पडले आहे. 

एवढे नुकसान कधीच झाले नाही-    एसटीच्या इतिहासातील हा सर्वात माेठा संप आहे. एसटीचे चाक नेहमीच ताेट्यात हाेते. मात्र एवढे नुकसान कधीच झाले नाही. संपामूळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटीला फार माेठी कसरत करावी लागणार आहे. 

एसटीविना नागरिकांना आता प्रवासाची सवय झाली

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे एसटीशिवाय प्रवास करण्याची हळूहळू सवय पडत चालली आहे. एसटीशिवाय नागरिक प्रवासच करू शकत नाही. या भ्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी राहू नये. अडचणीच्यावेळी प्रत्येक माणुस आपला मार्ग शाेधताेच.- आकाश देवतळे, युवक 

एसटी कर्मचाऱ्यांंना बाहेरच्या बेराेजगारीचा अजूनपर्यंत अंदाज आलेला नाही. शासनाने पदभरतीची जाहीरात काढल्यास लाखाे युवक एसटीत काम करण्यासाठी अर्ज करतील. शासनाने आजपर्यंतची सर्वात माेठी पगारवाढ दिली असताना एसटी कर्मचारी आंदाेलनावर कायम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांविषयी जनतेच्या मनात असेलेली सहानुभूती आता संपत चालली आहे. - देवेंद्र शिंदे, युवक

५ महिने काेराेनाचा  बसला फटकामागील दीड वर्षात काेराेनाची साथ हाेती. या कालावधीत जवळपास ५ महिने एसटीसेवा बंद हाेती. काेराेनाच्या कालावधीत एसटी सुरू झाली असली तरी पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने ताेटाच हाेत हाेता. 

संपाचे ५५ दिवस

मागील ५५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या कालावधीत एसटीचे उत्पन्न जवळपास शुन्य आहे. वाहने बंद असली तरी देखभाल खर्च सुरूच आहे. त्यामुळे ताेटा वाढत चालला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप