शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विश्रामगृह इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:31 IST

सन १९०७ साली मुलचेरा येथे वनविभागाची विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली. सदर विश्रामगृहाची इमारत ही ब्रिटीशकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देवनविभाग सुस्त : पाण्याअभावी परिसरातील झाडे मोजताहेत अखेरची घटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : सन १९०७ साली मुलचेरा येथे वनविभागाची विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली. सदर विश्रामगृहाची इमारत ही ब्रिटीशकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे. त्यातल्या त्यात सदर विश्रामगृह परिसरातील झाडांना पाण्याची व्यवस्था नसल्याने ही झाडे वाढत्या तापमानामुळे करपण्याच्या मार्गावर आहेत.मुलचेरा शहराच्या मध्यभागी वनविभागाचे विश्रामगृह आहे. सदर विश्रामगृहाच्या एक एकर जागेच्या सभोवताल झाडे लावण्यात आली आहेत. या ठिकाणी पाणी व्यवस्थेसाठी बोअर मारण्यात आला आहे. मात्र मागील एक वर्षापासून हा बोअर बंद असल्याने येथील झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र अशा स्थितीत कर्मचारी व वनमजुरांच्या मदतीने येथे झाडांना पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विश्रामगृह परिसरात असलेली जिवंत झाडे करपण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे जगविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ३३ कोटी वृक्ष लागवड योजना राबवून गावागावात झाडे लावण्याचे वनविभागाचे नियोजन आहे. परिणामी वृक्ष लागवड योजना हा निव्वळ फार्स ठरत आहे.गेल्या काही वर्षांत लावलेल्या झाडांचे चांगले प्रकारे संरक्षण व संवर्धन करून ही झाडे जगविणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे कानाडोळा करीत नवीन झाडे लावण्याचा वनविभागाचा प्रयत्न दिसून येत आहे. यात शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. वनविभागाच्या विश्रामगृह परिसरातील झाडांची पाण्याअभावी अशी अवस्था आहे तर इतर ठिकाणी लावलेल्या झाडांची काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेली बरी. एकूणच वनविभागाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.