शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

व्यसनमुक्तीचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:08 IST

आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनांपासून दूर असली पाहिजे. यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले.

ठळक मुद्देस्मिता पाटील यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे व्यसनमुक्तीवर व्याख्यान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनांपासून दूर असली पाहिजे. यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले.देसाईगंज येथील सिंधू भवनात शनिवारी व्यसनमुक्तीवर आधारित सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, सर्चचे संचालक डॉ. अभय बंग उपस्थित होते.स्व. आर. आर. पाटील यांनी ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण केले. त्यांच्या मते कोणताही राजकीय वारसा नसताना व आर्थिक संपन्नता नसताना केवळ प्रामाणिकपणाच्या बळावर राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळविले, असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्चचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले. कोणत्याही व्यसनाची सुरूवात अगदी सहज संगतीने होते. व नंतर हळुहळू त्याचे व्यसनात रूपांतर होते. जिल्ह्यातील तंबाखू सेवनाची समस्या अतिशय भीषण आहे. सर्वेनुसार येथे तंबाखू सेवन करणाºयांचे प्रमाण ५० टक्के आहे. विद्यार्थी, महिला, पुरूष आणि बचत गटातील महिलासुद्धा तंबाखूचे सेवन करीत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन आदिती अत्रे हिने केले. या कार्यक्रमाला देसाईगंज शहरातील बहुसंख्य नागरिक हजर होते.अहेरीत दिली व्यसनमुक्तीची शपथगडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात येऊन आबांनी जिल्हा विकासासाठी अनेक कामे केली. येथील लोकांच्या तोंडातून ते ऐकायला मिळत आहे. यावरून आबांसाठी जिल्ह्यात किती आपुलकी होती हे दिसून येते. ते जर अजून काही वेळ जगले असते तर जिल्ह्याचा कायापालट झाला असता, असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी रविवारी केले. अहेरी येथे संत मानव दयाल आश्रम शाळेत व्यसनमुक्तीवर आधारित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ. सुमन पाटील, सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग उपस्थित होते. पुढे बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, आबांना व्यसनाची सवय नसती तर आज ते आपल्यासमोर असते. त्यांच्या जाण्याने आपण विकासापासून किती दूर गेलो, हे लक्षात येत आहे. त्यामुळे आजच प्रत्येकांनी निश्चय करावा की, कोणत्याही व्यसनाच्या अधीन न जाता आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगेन आणि स्वत:पासून सुरुवात करून पूर्ण भारत व्यसनमुक्त करण्याचा निर्धार आणि निश्चय करूया, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांना शपथ देण्यात आली.