शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल सादर

By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST

भौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्हा विभाजनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.

शासनदरबारी निर्णय प्रलंबित : २५ मुद्यांच्या आधारे जिल्हा प्रशासनाने पाठविली राज्य शासनाकडे माहिती दिलीप दहेलकर गडचिरोलीभौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्हा विभाजनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. या अनुषंगाने शासनाने मागितलेली २५ मुद्यांवरील माहिती प्रशासनाने या अहवालात नमूद केली आहे. जिल्हा विभाजनाबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेऊन असल्याने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.मंत्रीमंडळस्तरावर असलेल्या या समितीत महसूल विभागाचे प्रधान सचिव हे अध्यक्ष आहेत. या समितीकडून सर्वच जिल्हा प्रशासनाला जिल्हा विभाजनाबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. यात २५ मुद्यांच्या आधारे माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल राज्य शासनाकडे तीन आठवड्यापूर्वी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्हा विभाजन करण्यासंदर्भात जिल्हा पुनर्रचना समितीच्या बैठकीत शासनाने २५ मुद्यांच्या आधारे मागितलेल्या माहितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित सर्व विभागाकडून माहिती मागून ती जिल्हा प्रशासनाने संकलीत केली. त्यानंतर जिल्हा विभाजनाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आॅगस्ट २०१५ रोजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल विभागाच्या एकूण ८८ पदांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात सध्या विविध विभागाचे १२७ कार्यालय असून आकृतीबंधानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ९ हजार ३७२ पदे निर्माण करण्यात आली आहेत. नवा अहेरी जिल्हा झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे वाढणार आहेत.कलेक्टर, सीईओ, एसपी कार्यालय होणारगडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास नव्या अहेरी जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण अहेरी निश्चित करणे उचित राहील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर अहेरी येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक हे तीन जिल्हास्तरावरचे कार्यालय नव्याने निर्माण करावे लागणार आहे. तेव्हाच प्रशासकीय कामकाज योग्य होऊन जनतेला न्याय मिळेल. सात ते आठ नवे तालुके होणारजिल्हा विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाने अहवालात नव्या तालुक्याची संख्या किती राहणार याची माहिती मागितली होती व यात किमान आठ ते बारा तालुक्यांचा समावेश राहावा, असे सूचित केले. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार अहेरी या स्वतंत्र जिल्ह्यात सात ते आठ नवे तालुके राहणार आहेत. जिमलगट्टा, जारावंडी, कमलापूर, पेंढरी आदींसह अन्य नव्या तालुक्याचा समावेश राहणार आहे. शेवटच्या गावाचे अंतर कमी होणारसध्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून शेवटच्या सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर २२० किमी असून या तालुक्यातील शेवटच्या गावाचे अंतर ३७० किमी आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा मुख्यालयापासून सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर ११० किमी राहणार असून सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर १५० किमी राहील, असे सादर केलेल्या अहवालात जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. याशिवाय भौगोलिक क्षेत्रफळाचे अंतरही कमी होणार आहे. जिल्हा विभाजनाच्या निकषात शिथिलता आवश्यकजिल्ह्याची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा घटक शास्त्रीयदृष्ट्या मुख्य मानून तो शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू करावा, एका तालुक्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाख गृहीत धरल्यास निर्माण होणाऱ्या नव्या जिल्ह्यात आठ ते बारा तालुके असावेत, तसेच नवनिर्मित जिल्ह्याची लोकसंख्या २४ ते ३० लाख अशी असावी, असे शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाने नव्या जिल्हा निर्मितीसाठी हेच निकष कायम ठेवल्यास स्वतंत्र अहेरी जिल्हा होण्याची शक्यता फार कमी आहे. राज्य शासनाने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करण्यासाठी लोकसंख्या व तालुक्याचे सदर निकष शिथील करणे आवश्यक आहे.