शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल सादर

By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST

भौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्हा विभाजनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.

शासनदरबारी निर्णय प्रलंबित : २५ मुद्यांच्या आधारे जिल्हा प्रशासनाने पाठविली राज्य शासनाकडे माहिती दिलीप दहेलकर गडचिरोलीभौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्हा विभाजनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. या अनुषंगाने शासनाने मागितलेली २५ मुद्यांवरील माहिती प्रशासनाने या अहवालात नमूद केली आहे. जिल्हा विभाजनाबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेऊन असल्याने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.मंत्रीमंडळस्तरावर असलेल्या या समितीत महसूल विभागाचे प्रधान सचिव हे अध्यक्ष आहेत. या समितीकडून सर्वच जिल्हा प्रशासनाला जिल्हा विभाजनाबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. यात २५ मुद्यांच्या आधारे माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल राज्य शासनाकडे तीन आठवड्यापूर्वी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्हा विभाजन करण्यासंदर्भात जिल्हा पुनर्रचना समितीच्या बैठकीत शासनाने २५ मुद्यांच्या आधारे मागितलेल्या माहितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित सर्व विभागाकडून माहिती मागून ती जिल्हा प्रशासनाने संकलीत केली. त्यानंतर जिल्हा विभाजनाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आॅगस्ट २०१५ रोजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल विभागाच्या एकूण ८८ पदांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात सध्या विविध विभागाचे १२७ कार्यालय असून आकृतीबंधानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ९ हजार ३७२ पदे निर्माण करण्यात आली आहेत. नवा अहेरी जिल्हा झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे वाढणार आहेत.कलेक्टर, सीईओ, एसपी कार्यालय होणारगडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास नव्या अहेरी जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण अहेरी निश्चित करणे उचित राहील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर अहेरी येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक हे तीन जिल्हास्तरावरचे कार्यालय नव्याने निर्माण करावे लागणार आहे. तेव्हाच प्रशासकीय कामकाज योग्य होऊन जनतेला न्याय मिळेल. सात ते आठ नवे तालुके होणारजिल्हा विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाने अहवालात नव्या तालुक्याची संख्या किती राहणार याची माहिती मागितली होती व यात किमान आठ ते बारा तालुक्यांचा समावेश राहावा, असे सूचित केले. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार अहेरी या स्वतंत्र जिल्ह्यात सात ते आठ नवे तालुके राहणार आहेत. जिमलगट्टा, जारावंडी, कमलापूर, पेंढरी आदींसह अन्य नव्या तालुक्याचा समावेश राहणार आहे. शेवटच्या गावाचे अंतर कमी होणारसध्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून शेवटच्या सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर २२० किमी असून या तालुक्यातील शेवटच्या गावाचे अंतर ३७० किमी आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा मुख्यालयापासून सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर ११० किमी राहणार असून सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर १५० किमी राहील, असे सादर केलेल्या अहवालात जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. याशिवाय भौगोलिक क्षेत्रफळाचे अंतरही कमी होणार आहे. जिल्हा विभाजनाच्या निकषात शिथिलता आवश्यकजिल्ह्याची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा घटक शास्त्रीयदृष्ट्या मुख्य मानून तो शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू करावा, एका तालुक्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाख गृहीत धरल्यास निर्माण होणाऱ्या नव्या जिल्ह्यात आठ ते बारा तालुके असावेत, तसेच नवनिर्मित जिल्ह्याची लोकसंख्या २४ ते ३० लाख अशी असावी, असे शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाने नव्या जिल्हा निर्मितीसाठी हेच निकष कायम ठेवल्यास स्वतंत्र अहेरी जिल्हा होण्याची शक्यता फार कमी आहे. राज्य शासनाने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करण्यासाठी लोकसंख्या व तालुक्याचे सदर निकष शिथील करणे आवश्यक आहे.