शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१८ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण

By admin | Updated: September 2, 2016 01:12 IST

२०१५-१६ या खरीप हंगामात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ४ हजार ६२९ शेतकऱ्यांच्या १८ कोटी १९ लाख २० हजार

मदत : ४ हजार ६२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : २०१५-१६ या खरीप हंगामात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ४ हजार ६२९ शेतकऱ्यांच्या १८ कोटी १९ लाख २० हजार रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे. बहुतांश शेतकरी राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांकडून कर्ज घेऊन शेतीची मशागत करतात. मागील वर्षी राज्यभरात कोरडा दुष्काळ पडला होता. याची झळ गडचिरोली जिल्ह्यालाही बसली होती. रोवलेले धानपीक करपल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. त्यामुळे धानपिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. राज्य शासनाने जे शेतकरी पूर्णपणे कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्जापैकी ८ हजार ९०१ शेतकऱ्यांचे २६ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज पुनर्गठणासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४ हजार ६२९ शेतकऱ्यांचे १८ कोटी १९ लाख २० हजार रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी ३ हजार ९३९ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४ लाख रूपयांचे कर्ज स्वत: भरले आहे. (नगर प्रतिनिधी)