शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बंडखोरी कराल तर याद राखा!

By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला

सत्तामिलन : जि.प.मध्ये आघाडी करताना काँग्रेसने राकाँला सुनाविलेगडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला विधानसभेत पक्षाकडून बंडखोरी झाली तर याद राखा, असा मोठा दम भरल्याची दोन्ही पक्षाच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस १४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. कालांतराने भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या सदस्य मदनी बोगामी यांनी राजीनामा दिल्याने ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. १३ सदस्याच्या काँग्रेस सोबत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करता भाजपसोबत घरठाव करीत भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेसला नेहमी पडती भूमिका घ्यावी लागत होती. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्य पातळीवरूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीबाबत सुतोवाच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट या अडीच वर्षाच्या काळात पडली. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्याही गटासोबत हात मिळवणी करू शकले असते. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची मनधरणी केल्याने काँग्रेसने धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना काँग्रेसच्या वाट्यातील आरमोरी व गडचिरोली या दोनही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही बंडखोरी होणार नाही, असा पक्का शब्द घेण्यात आला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आघाडीची चर्चा होत असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर या निवडणूक लढणार नाहीत ना ? अशी विचारणा दस्तखुर्द धर्मरावबाबा आत्राम यांनाच केली, अशीही माहिती आहे. काँग्रेसचा पोरेड्डीवार गट वगळता. डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे या सर्वांना राष्ट्रवादीच्या बंडखोरीबाबत चिंता होती. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये दोन पक्षाची आघाडी करताना विधानसभेत बंडखोरी होणार नाही, याचा शब्द राकाँकडून घेतला आहे, अशी माहिती आहे. आघाडी धर्माचे पालन करू, असे आश्वासन राकाँच्या नेतृत्वाने काँग्रेसला दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना याची पूर्ण माहिती दिली व काँग्रेस राकाँ आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. (जिल्हा प्रतिनिधी)