शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बंडखोरी कराल तर याद राखा!

By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला

सत्तामिलन : जि.प.मध्ये आघाडी करताना काँग्रेसने राकाँला सुनाविलेगडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला विधानसभेत पक्षाकडून बंडखोरी झाली तर याद राखा, असा मोठा दम भरल्याची दोन्ही पक्षाच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस १४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. कालांतराने भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या सदस्य मदनी बोगामी यांनी राजीनामा दिल्याने ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. १३ सदस्याच्या काँग्रेस सोबत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करता भाजपसोबत घरठाव करीत भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेसला नेहमी पडती भूमिका घ्यावी लागत होती. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्य पातळीवरूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीबाबत सुतोवाच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट या अडीच वर्षाच्या काळात पडली. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्याही गटासोबत हात मिळवणी करू शकले असते. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची मनधरणी केल्याने काँग्रेसने धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना काँग्रेसच्या वाट्यातील आरमोरी व गडचिरोली या दोनही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही बंडखोरी होणार नाही, असा पक्का शब्द घेण्यात आला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आघाडीची चर्चा होत असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर या निवडणूक लढणार नाहीत ना ? अशी विचारणा दस्तखुर्द धर्मरावबाबा आत्राम यांनाच केली, अशीही माहिती आहे. काँग्रेसचा पोरेड्डीवार गट वगळता. डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे या सर्वांना राष्ट्रवादीच्या बंडखोरीबाबत चिंता होती. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये दोन पक्षाची आघाडी करताना विधानसभेत बंडखोरी होणार नाही, याचा शब्द राकाँकडून घेतला आहे, अशी माहिती आहे. आघाडी धर्माचे पालन करू, असे आश्वासन राकाँच्या नेतृत्वाने काँग्रेसला दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना याची पूर्ण माहिती दिली व काँग्रेस राकाँ आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. (जिल्हा प्रतिनिधी)