शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी कराल तर याद राखा!

By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला

सत्तामिलन : जि.प.मध्ये आघाडी करताना काँग्रेसने राकाँला सुनाविलेगडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला विधानसभेत पक्षाकडून बंडखोरी झाली तर याद राखा, असा मोठा दम भरल्याची दोन्ही पक्षाच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस १४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. कालांतराने भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या सदस्य मदनी बोगामी यांनी राजीनामा दिल्याने ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. १३ सदस्याच्या काँग्रेस सोबत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करता भाजपसोबत घरठाव करीत भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेसला नेहमी पडती भूमिका घ्यावी लागत होती. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्य पातळीवरूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीबाबत सुतोवाच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट या अडीच वर्षाच्या काळात पडली. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्याही गटासोबत हात मिळवणी करू शकले असते. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची मनधरणी केल्याने काँग्रेसने धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना काँग्रेसच्या वाट्यातील आरमोरी व गडचिरोली या दोनही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही बंडखोरी होणार नाही, असा पक्का शब्द घेण्यात आला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आघाडीची चर्चा होत असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर या निवडणूक लढणार नाहीत ना ? अशी विचारणा दस्तखुर्द धर्मरावबाबा आत्राम यांनाच केली, अशीही माहिती आहे. काँग्रेसचा पोरेड्डीवार गट वगळता. डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे या सर्वांना राष्ट्रवादीच्या बंडखोरीबाबत चिंता होती. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये दोन पक्षाची आघाडी करताना विधानसभेत बंडखोरी होणार नाही, याचा शब्द राकाँकडून घेतला आहे, अशी माहिती आहे. आघाडी धर्माचे पालन करू, असे आश्वासन राकाँच्या नेतृत्वाने काँग्रेसला दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना याची पूर्ण माहिती दिली व काँग्रेस राकाँ आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. (जिल्हा प्रतिनिधी)