शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईटियाडोह धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:42 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देधानपीक करपण्यास सुरुवात : आरमोरीतील शाखा अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.पावसाने उसंत घेतली आहे. त्याचबरोबर दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतीला ईटियाडोह धरणाचे पाणी उपलब्ध होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. पाणी नसल्याने निंदनाचे काम बंद पडले आहे. तसेच खताचा दुसरा डोजही लांबणीवर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विहीर, नाल्यावर इंजन लावून पाणी करीत आहेत. धानपीक गर्भाशयात येण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका धानपिकाला बसून उत्पादनात कमालीची घट निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच शेतकरी पाणी सोडण्याची मागणी करीत असतानाही सिंचन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरमोरीपासून ईटियाडोह धरण ५० पेक्षा अधिक किमी अंतर आहे. आरमोरी तालुक्यातील शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत धान करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा पाणी सोडल्यास पाण्यासाठी शेतकºयांचे भांडणे वाढतात. त्यामुळे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी सिंचन विभाग, ईटियाडोहचे शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनावर देवा खोब्रागडे, शालिकराम पत्रे, रितेश पिल्लारे, दिलीप पारधी, खुशाल राऊत, विनोद ठाकरे, दादाजी गुरनुले, बाबुराव दिघोरे, अभिमन्यू धोटे, मोहन बांडे, नानाभाऊ धोटे, विलास मैंद, नामदेव बावणे, तुकाराम जीवतोडे, मधुकर कुथे, श्रीराम कुथे, विलास जीवतोडे यांच्या स्वाक्षºया आहेत.