शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

ईटियाडोह धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:42 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देधानपीक करपण्यास सुरुवात : आरमोरीतील शाखा अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.पावसाने उसंत घेतली आहे. त्याचबरोबर दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतीला ईटियाडोह धरणाचे पाणी उपलब्ध होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. पाणी नसल्याने निंदनाचे काम बंद पडले आहे. तसेच खताचा दुसरा डोजही लांबणीवर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विहीर, नाल्यावर इंजन लावून पाणी करीत आहेत. धानपीक गर्भाशयात येण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका धानपिकाला बसून उत्पादनात कमालीची घट निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच शेतकरी पाणी सोडण्याची मागणी करीत असतानाही सिंचन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरमोरीपासून ईटियाडोह धरण ५० पेक्षा अधिक किमी अंतर आहे. आरमोरी तालुक्यातील शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत धान करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा पाणी सोडल्यास पाण्यासाठी शेतकºयांचे भांडणे वाढतात. त्यामुळे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी सिंचन विभाग, ईटियाडोहचे शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनावर देवा खोब्रागडे, शालिकराम पत्रे, रितेश पिल्लारे, दिलीप पारधी, खुशाल राऊत, विनोद ठाकरे, दादाजी गुरनुले, बाबुराव दिघोरे, अभिमन्यू धोटे, मोहन बांडे, नानाभाऊ धोटे, विलास मैंद, नामदेव बावणे, तुकाराम जीवतोडे, मधुकर कुथे, श्रीराम कुथे, विलास जीवतोडे यांच्या स्वाक्षºया आहेत.