शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

ईटियाडोह धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:42 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देधानपीक करपण्यास सुरुवात : आरमोरीतील शाखा अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.पावसाने उसंत घेतली आहे. त्याचबरोबर दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतीला ईटियाडोह धरणाचे पाणी उपलब्ध होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. पाणी नसल्याने निंदनाचे काम बंद पडले आहे. तसेच खताचा दुसरा डोजही लांबणीवर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विहीर, नाल्यावर इंजन लावून पाणी करीत आहेत. धानपीक गर्भाशयात येण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका धानपिकाला बसून उत्पादनात कमालीची घट निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच शेतकरी पाणी सोडण्याची मागणी करीत असतानाही सिंचन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरमोरीपासून ईटियाडोह धरण ५० पेक्षा अधिक किमी अंतर आहे. आरमोरी तालुक्यातील शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत धान करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा पाणी सोडल्यास पाण्यासाठी शेतकºयांचे भांडणे वाढतात. त्यामुळे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी सिंचन विभाग, ईटियाडोहचे शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनावर देवा खोब्रागडे, शालिकराम पत्रे, रितेश पिल्लारे, दिलीप पारधी, खुशाल राऊत, विनोद ठाकरे, दादाजी गुरनुले, बाबुराव दिघोरे, अभिमन्यू धोटे, मोहन बांडे, नानाभाऊ धोटे, विलास मैंद, नामदेव बावणे, तुकाराम जीवतोडे, मधुकर कुथे, श्रीराम कुथे, विलास जीवतोडे यांच्या स्वाक्षºया आहेत.