शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:48 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, ....

ठळक मुद्देपाणीपातळी घटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेने नदीपात्रात इनटेक वेल खोदली आहे. त्याच्या सभोवताला रेतीचा बंधारा सुद्धा बांधला आहे. विहिरीला दोन वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने एक वॉल्व पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवावे लागत आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही वॉर्डात दिवसातून एकचवेळा पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपातळी आणखी कमी झाल्यास दुसरा वॉल्व सुद्धा पाण्याबाहेर पडण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे व जून हे तीन महिने शिल्लक आहेत. पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यास तीव्र जलसंकटांचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेला दुसरे पाण्याचे स्त्रोत नाही. परिणामी वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीत साडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, भूपेश कुळमेथे, पाणीपुरवठा विभागाचे शरद सोनटक्के उपस्थित होते.