शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:48 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, ....

ठळक मुद्देपाणीपातळी घटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेने नदीपात्रात इनटेक वेल खोदली आहे. त्याच्या सभोवताला रेतीचा बंधारा सुद्धा बांधला आहे. विहिरीला दोन वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने एक वॉल्व पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवावे लागत आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही वॉर्डात दिवसातून एकचवेळा पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपातळी आणखी कमी झाल्यास दुसरा वॉल्व सुद्धा पाण्याबाहेर पडण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे व जून हे तीन महिने शिल्लक आहेत. पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यास तीव्र जलसंकटांचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेला दुसरे पाण्याचे स्त्रोत नाही. परिणामी वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीत साडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, भूपेश कुळमेथे, पाणीपुरवठा विभागाचे शरद सोनटक्के उपस्थित होते.