शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:04 IST

भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले.

ठळक मुद्दे३९ नक्षलवादी ठार झाल्यामुळे गावकरी आनंदी : जेवण व इतर बाबींसाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. यामुळे बोरियावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून नक्षल्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्यातील बोरिया हे गाव इंद्रावती नदीजवळ आहे. छत्तीसगड राज्य व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे येणे-जाणे वर्षभर सुरू राहत होते. सभोवताल घनदाट जंगल असल्याने नक्षल्यांसाठी बोरिया हे गाव रेस्ट झोन बनले होते. याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. बºयाचवेळा बंदुकीच्या धाकावर जेवण मागितले जात होते. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना नक्षल्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. अनेकदा नक्षल्यांची संख्या ५० ते १०० च्या जवळपास असल्यास संबंधित नागरिकांच्या घरचे संपूर्ण एक महिन्याचे धान्य दोन ते तीन दिवसांतच संपत होते. एखाद्या नागरिकाने घरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्यास बंदुकीचे टोक त्याच्या छातीवर ठेवले जात होते. गावात रस्ता व इतर सुविधा झाल्यास नक्षल्यांचे वास्तव्य अडचणीत येण्याची शक्यता असल्याने या गावात रस्ते व इतर सुविधा निर्माण होऊ नये, यासाठी नक्षली नेहमीच प्रयत्न करीत होते. परिणामी शासनाच्या योजना अजूनही या गावापर्यंत पोहोचल्या नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर दिसून येते.नक्षल्यांकडून होणारी मारझोड, हिंसक कृत्यांमध्ये गावातील नागरिकांना बळजबरीने भाग घ्यायला लावणे, गावात नाचगाणे करायला लावणे यामुळे गावातील नागरिक कायम दहशतीखाली जीवन जगत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यातील सर्वच नक्षलवादी पेरमिली दलमचे होते व ते बोरिया गावातील नागरिकांचा स्वत:साठी गैरवापर करीत होते. पोलीस दलाने सुमारे ३९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने या गावातील नक्षलवाद्यांचा वावर जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बोरिया गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते.नक्षल्यांच्या विरोधामुळेच गावाचा विकास रखडलाभामरागड तालुक्यातील अनेक गावे जंगलात वसली आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रयत्न करून विविध योजना पोहोचविल्या आहेत. मात्र बोरिया हे गाव नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन बनले होते. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये, यासाठी या गावात व गावाच्या जवळपास रस्ते निर्मितीस नक्षलवाद्यांचा नेहमीच विरोध राहिला होता.२२ एप्रिल रोजी बहुतांश नक्षलवादी ठार झाल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या अमानुष कृत्याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. या कारवाईमुळे या गावातील नक्षल्यांची दहशत संपणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल.शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी २२ व २३ एप्रिलच्या घटनेबाबत सी-६० पोलीस जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी