शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:04 IST

भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले.

ठळक मुद्दे३९ नक्षलवादी ठार झाल्यामुळे गावकरी आनंदी : जेवण व इतर बाबींसाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. यामुळे बोरियावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून नक्षल्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्यातील बोरिया हे गाव इंद्रावती नदीजवळ आहे. छत्तीसगड राज्य व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे येणे-जाणे वर्षभर सुरू राहत होते. सभोवताल घनदाट जंगल असल्याने नक्षल्यांसाठी बोरिया हे गाव रेस्ट झोन बनले होते. याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. बºयाचवेळा बंदुकीच्या धाकावर जेवण मागितले जात होते. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना नक्षल्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. अनेकदा नक्षल्यांची संख्या ५० ते १०० च्या जवळपास असल्यास संबंधित नागरिकांच्या घरचे संपूर्ण एक महिन्याचे धान्य दोन ते तीन दिवसांतच संपत होते. एखाद्या नागरिकाने घरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्यास बंदुकीचे टोक त्याच्या छातीवर ठेवले जात होते. गावात रस्ता व इतर सुविधा झाल्यास नक्षल्यांचे वास्तव्य अडचणीत येण्याची शक्यता असल्याने या गावात रस्ते व इतर सुविधा निर्माण होऊ नये, यासाठी नक्षली नेहमीच प्रयत्न करीत होते. परिणामी शासनाच्या योजना अजूनही या गावापर्यंत पोहोचल्या नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर दिसून येते.नक्षल्यांकडून होणारी मारझोड, हिंसक कृत्यांमध्ये गावातील नागरिकांना बळजबरीने भाग घ्यायला लावणे, गावात नाचगाणे करायला लावणे यामुळे गावातील नागरिक कायम दहशतीखाली जीवन जगत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यातील सर्वच नक्षलवादी पेरमिली दलमचे होते व ते बोरिया गावातील नागरिकांचा स्वत:साठी गैरवापर करीत होते. पोलीस दलाने सुमारे ३९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने या गावातील नक्षलवाद्यांचा वावर जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बोरिया गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते.नक्षल्यांच्या विरोधामुळेच गावाचा विकास रखडलाभामरागड तालुक्यातील अनेक गावे जंगलात वसली आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रयत्न करून विविध योजना पोहोचविल्या आहेत. मात्र बोरिया हे गाव नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन बनले होते. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये, यासाठी या गावात व गावाच्या जवळपास रस्ते निर्मितीस नक्षलवाद्यांचा नेहमीच विरोध राहिला होता.२२ एप्रिल रोजी बहुतांश नक्षलवादी ठार झाल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या अमानुष कृत्याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. या कारवाईमुळे या गावातील नक्षल्यांची दहशत संपणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल.शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी २२ व २३ एप्रिलच्या घटनेबाबत सी-६० पोलीस जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी